AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मावळ खोऱ्यात भात हे मुख्य पीक, पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरवात

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस अती प्रमाणात असलेल्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्यामुळे लोकांनी पावसाची वाट न पाहता पेरणीला सुरवात केली आहे.

मावळ खोऱ्यात भात हे मुख्य पीक, पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरवात
pune manav news in marathiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2023 | 8:52 AM
Share

विनय जगताप, मावळ : पुण्याच्या भोर (PUNE BHOR) तालुक्यातील हिर्डस मावळ (HIRDUS MAVAL) खोऱ्यातील शेतकऱ्यांची धूळ वाफेवर भात पेरणीची लगबग सुरु झाली आहे. जून महिना सुरु होऊन आठ दिवस झाले आहेत. पावसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला होता. तरी सुध्दा शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व (sowing) सगळ्या मशागती केल्या आहेत. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बी हंगाम (Agricultural news in marathi) पुर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी मोठा निराश झाला होता. मावळ मधील शेतकरी वर्ग पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे. काही ठिकाणी बैलांच्या साहाय्याने कुळवणी आणि नांगरणी झाली आहे.

धूळ वाफेवर भात पेरणीची लगबग

पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डस मावळ खोऱ्यातील शेतकऱ्यांची धूळ वाफेवर भात पेरणी सुरु झाली आहे. जून महिना सुरू झाल्यानं पावसाची वाट न पाहता या भागातील शेतकऱ्यांनी, पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात शेतात शेतकरी राबताना दिसला आहे. त्याचबरोबर औताच्या साहाय्याने कुळवणी करून पारंपरिक पद्धतीने याठिकाणी भात पेरणी केली जात आहे. भात हे मावळ तालुक्यातलं प्रमुख पीक आहे. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून असतो.

ई-केवायसी करणे बंधनकारक

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मावळ कृषी विभागाकडून गावोगावी “ई – के वाय सी” करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक पुणे, यांनी मावळ भागाचा दौरा केला आहे. पाचाने व तिकोना गावात जाऊन नागरी सुविधा केंद्राला त्यांनी भेटी सुध्दा दिल्या आहेत. शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे या कामासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास खात्याच्या क्षेत्रीय कर्मचारी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक गावोगावी कॅम्प लावून, वार्ताफलक लिहिणे, दवंडी देणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचारी प्रसिध्दीचं काम करीत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये 6 हजार तीन हप्त्यात मिळतात. जर ई-केवायसी केली नाही, तर ही रक्कम मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागेल.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.