AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Crop: कापसाच्या वाढत्या दरामुळे कृषी विभागाचे धोरणही बदलले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर

खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या कपाशीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. कापसाची जागा आता सोयाबीने घेतले असून मराठवाड्यातीलच नाही तर राज्यात सोयाबीन हेच मुख्य पीक झाले आहे. मात्र, यंदाच्या दराचा विचार करता कृषी विभागाला आपल्या धोरणात बदल करावे लागतील असेच चित्र आहे.

Cotton Crop: कापसाच्या वाढत्या दरामुळे कृषी विभागाचे धोरणही बदलले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर
| Updated on: Feb 19, 2022 | 2:36 PM
Share

औरंगाबाद: खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या कपाशीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. कापसाची जागा आता सोयाबीने घेतले असून (Marathwada) मराठवाड्यातीलच नाही तर राज्यात सोयाबीन हेच मुख्य पीक झाले आहे. मात्र, यंदाच्या दराचा विचार करता (Agricultural Department) कृषी विभागाला आपल्या धोरणात बदल करावे लागतील असेच चित्र आहे. कारण फरदडमुळे होणारे नुकसान आणि बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी (Cotton Crop) कापसाला पर्यायी पीक घेण्याचे आवाहन केले जात होते. पण आता आगामी काळात कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा निर्वाळा कृषी विभागानेच दिला आहे. त्यामुळे यंदा कापसाला मिळालेला विक्रमी दराचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होणार हे नक्की आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. पण आता कापूस 10 हजारावर स्थिरावलेला असून सध्या खरेदी केंद्रावर फरदड कापसाची आवक सुरु आहे.गेल्या 10 वर्षात अशाप्रकारे कापसाच्या दरात वाढ झाली नव्हती. पण यंदा घटलेल्या उत्पादनामुळे पांढऱ्या सोन्याला अधिकची झळाळी मिळाली आहे.

उत्पादनाला दुहेरी फटका

घटते दर आणि बोंडअळीच्या इतर पिकांवरही होत असलेला परिणाम यामुळे गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटलेले आहे. घटते क्षेत्र यामध्ये यंदा अधिकचा पाऊस आणि पीक अंतिम टप्प्यात असताना वाढलेला बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात निम्म्यानेच घट झाली होती. एकरी 7 ते 8 क्विंटलचे उत्पादन थेट 2 ते 3 क्विंटलवर येऊन ठेपले होते. उत्पादनात घट अन् बाजारपेठेत वाढलेली मागणी यामुळे कापसाला या हंगामात सर्वाधिक 11 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. घटलेले क्षेत्र आणि निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसला तरी वाढीव दरामुळे ती कसर ही भरुन निघाली होती.

आगामी हंगामात वाढणार क्षेत्र

कापसामुळे दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान होते शिवाय शेतजमिनीचा दर्जाही खालावतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला इतर पिकांचा पर्याय निवडण्याचे आवाहान कृषी विभागाच्या माध्यमातूनच केले जात होते. पण यंदाचे दर पाहता आता आगामी काळात कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागानेच व्यक्त केला आहे.यापूर्वी 5 हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिकचा दर कापसाला मिळत नव्हता पण शेतकऱ्यांचा कल आता नगदी पिकावर आहे. त्यामुळे आगामी खरीपात सोयाबीन बरोबर कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

Latur Division : ज्वारी क्षेत्रात घट, हरभऱ्यात दुपटीने वाढ, मुख्य पिकाकडेच का होतेय दुर्लक्ष?

Drone Farming : शेती व्यवसयाचे बदलते चित्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 ‘किसान ड्रोन’ला हिरवा झेंडा

शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा ‘आधार’, हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात

Follow Us
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.