AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा ‘आधार’, हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात

सध्याही ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी कामे उरकून थेट बाजारपेठेत विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा हमीभाव ठरवून दिला आहे. आता हरभऱ्याची आवक सुरु होऊन 15 दिवासाचा कालावधी लोटला असताना राज्यात हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा 'आधार', हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात
रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार मिळणार आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 19, 2022 | 11:40 AM
Share

स्वप्नील उमाप:  अमरावती: शेतीमालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील दर काय आहेत यावरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. यातच गेल्या वर्षभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होत आहे. सध्याही ढगाळ वातावरणामुळे (Rabi Season) रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी कामे उरकून थेट बाजारपेठेत विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. (Central Government) केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा हमीभाव ठरवून दिला आहे. आता हरभऱ्याची आवक सुरु होऊन 15 दिवासाचा कालावधी लोटला असताना (Maharashtra) राज्यात हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे. त्याअनुशंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये 8 खरेदी केंद्र उभारले जाणार आहेत. सध्या प्रत्यक्षात खरेदी होत नसली तरी नोंदणीला प्रारंभ झाला आहे. महिनाभर शेतकऱ्यांना केवळ नोंदणी आणि त्यानंतर हरभऱ्याची विक्रीही करता येणार आहे. यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परिणामी आवकही वाढणार असल्याने या खरेदी केंद्राच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सध्या बाजारपेठेतील स्थिती काय ?

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केल्याने उत्पादनाच्या दृष्टीने हरभरा पिकावरच भर दिला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावरच हरभऱ्याचेच पीक आहे. शिवाय गेल्या 15 दिवसांपासून हरभरा या पिकाची आवक सुरु झाली असून खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तर केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा दर ठरवून दिला आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला असून आता नोंदणी आणि 15 मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीव असे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यामधील खरेदी केंद्र

जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदूर रेल्वे, धारणी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी,पथ्रोट व नेरपिंगळाई येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था,नेरपिंगळाईमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

क्षेत्र वाढले मात्र उत्पादन घटले

रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी बदलत्या वातावऱणाचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आहे. अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे वाढलेला घाटीअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटलेले आहे. शिवाय सध्या हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत कमी दर असल्याने हमीभाव केंद्र सुरु होणे ही काळाची गरज होती. आता प्रत्यक्षात खरेदी होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?

Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!

Onion Rate : कांद्यामुळे नव्हे तर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, वाढीव दरावर निर्णय काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली