AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?

नाही म्हणलं तरी खरिपातील सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत दरातील चढउतारामुळे सोयाबीनची साठवणूक की विक्री यामुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत होती. आता हंगामातील सर्वाधिक दर मिळूनही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हे संभ्रमातच आहेत. कारण जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या दरात मोठी तफावत आढळून येत आहे.

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 10:52 AM
Share

वाशिम : नाही म्हणलं तरी  (Kharif Season) खरिपातील सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत दरातील चढउतारामुळे सोयाबीनची साठवणूक की विक्री यामुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत होती. आता हंगामातील सर्वाधिक दर मिळूनही (Washim District) वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हे संभ्रमातच आहेत. कारण जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात मोठी तफावत आढळून येत आहे. सोयाबीनची विक्री करावी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजार समितीमध्येच दर कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. सध्या सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत. मात्र, बाजार समित्यांमधील दरात मोठी तफावत आढळून येत असल्याने सोयाबीनची विक्री करावी की साठणूक हा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोडच्या बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 6650 रुपये प्रती क्विंटल दर मिळत असताना, वाशिमच्या बाजार समितीत मात्र 300 ते 400 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वाधिक दर

सोयाबीनचा संपूर्ण हंगाम हा दरातील चढ-उतारामुळे कायम चर्चेत राहिला होता. कारण सोयाबीन हेच खरीप हंगमातील मुख्य पीक आहे शिवाय उत्पादनात मोठी घट झाल्याने विक्रमी दर मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण 6 हजार 500 पेक्षा अधिकचा दर मिळालेला नाही. असे असतानाही शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हा निर्णय घेतल्याने मोठा फायदा झाला आहे. आता केवळ साठवणूकीतले सोयाबीन शेतकऱ्यांकडे असून प्रति क्विंटल 6 हजार 500 पर्यंत सरासरीचा दर आहे. त्यामुळे आवकही वाढत आहे. आता सलग दोन दिवस बाजार समित्यांना सुट्टी राहणार असल्याने सोमवारी पुन्हा आवक वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बाजार समित्यांच्या दरामध्ये तफावत, नेमके कारण काय?

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोडच्या बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 6650 रुपये प्रती क्विंटल दर मिळत असताना, वाशिमच्या बाजार समितीत मात्र 300 ते 400 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. असे असले यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सोयाबीनचा दर्जा, वाहतूकीचा खर्च आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कडता पध्दत यामुळे दरात तफावत ही असतेच. परंतू ही तफावत 300 पेक्षा असेल तर ते मात्र, चुकीचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षा 7 हजार रुपये दराची

यंदा संपूर्ण हंगामात सोयाबीनला सरासरीप्रमाणे दर मिळालेला आहे. आता हंगाम संपत असताना सोयाबीनला किमान 7 हजारापर्यंतचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण या वाढीव दराच्या अपेक्षेमध्ये न राहता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केलेलेच फायद्याचे राहणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजूनही मागणी वाढलेली नाही शिवाय सर्वाधिक उत्पादन घेतले जाणाऱ्या ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणीला वेग आला आहे. त्यामुळे दर घटण्याचाच अधिकचा धोका असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!

Summer Soybean: महाबीजच्या जनजागृतीने सोयाबीन क्षेत्र वाढले आता शेतकऱ्यांची परीक्षा..!

E-Pik Pahani : घटत्या नोंदणीमुळे निर्णयात बदल, शेतकरी घेणार का वाढीव मुदतीचा फायदा?

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.