AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 World Cup : टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका, हा धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरताच…ट्रॉफीसाठी हवा वेगळा प्लॅन!

सध्या जगभरात टी-20 विश्वचषक स्पर्धेची चर्चा आहे. भारत या स्पर्धेत जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. परंतु आता भारतापुढे एक खेळाडू मोठं संकट म्हणून उभं राहू शकतो.

T-20 World Cup : टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका, हा धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरताच...ट्रॉफीसाठी हवा वेगळा प्लॅन!
t 20 team indiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 12, 2026 | 7:31 PM
Share

T-20 World Cup : सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची धूम चालू आहे. या स्पर्धेतील सामने अटीतटाची होताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक संघ ट्रॉफी मिळवण्यासाठी जीवाचे रान करतोय. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान, यावेळी भारताला अडचणीचा ठरू शकणारा एक खेळाडू चांगलाच चर्चेत आला आहे. भारताचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न या खेळाडूमुळे अधुरं राहतं की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. शेरफेन रुदरफोर्ड असं या खेळाडूचं नाव आहे.

वेस्टइंडीजचा हा खेळाडू भारतासाठी डोकेदुखी?

शेरफेन रुदरफोर्ड हा खेळाडू वेस्टइंडीज या संघातील स्टार फलंदाज म्हणून ओळखला जातो. शध्या तो चांगलाच फॉर्ममध्ये असून मैदानावर फलंदाजीसाठी आल्यावर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाहायला मिळतोय. नुकतेच 11 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यात टी-20 विश्वचषकाचा 15 वा सामना झाला. या सामन्यातही रुदफोर्डने दमदार कामगिरी केली. हा सामना वेस्टइंडीजने 30 धावांनी जिंकली. वेस्टइंडीजे एकूण 196 धावा केल्या. इंग्लंडला फक्त 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण हाच रुदरफोर्ड हा खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे.

अवघ्या 42 चेंडूमध्ये 76 धावा

इंग्लंडविरोधातील सामन्यात रुदरफोर्ड याने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 42 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. विशेष म्हणजे या सामन्यात तो नाबाद राहिला. इग्लंडच्या वेगवान तसेच फिरकीपटूंना त्याने अशरक्ष: धुतले. त्यामुळेच तो भविष्यात भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

भारताचं टेन्शन नेमकं का वाढलं?

शेरफेन रुदरफोर्ड हा खेळाडू भारतासाठी मोठं संकट असल्याचे मानले जात आहे. टी-20 विश्वचषकाच्या जेतेपदाचा भारत हा प्रबळ दावेदार आहे. आगामी काळात सुपर-8 आणि नॉकआऊट सामन्यांत भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. रुदरफोर्ड ज्या पद्धतीने वेगवान आणि फिरकीपटूंना सामोरे जाते, ती आक्रमकता पाहून भारतापुढे तो मोठे आव्हान उभे करू शकतो, असा अंदाज व्य्क्त केला जातोय. त्यामुळेच आता भारतीय संघाला रुदरफोर्डच्या कमतरता शोधाव्या लागतील. भारतीय गोलंदाजांना रुदरफोर्डची हीच कमतरता हेरून चेंडूचा मारा करावा लागेल. त्यामुळे भविष्यात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.