AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप, आई आणि मुलं… घरात आढळले चौघांचे मृतदेह… मुंबईचं नेव्हीनगर हादरलं

मुंबईतील नेव्ही नगरमध्ये नौदल जवान, त्यांची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी व मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा, तर जवानाने गळफास घेतल्याचा प्राथमिक संशय आहे. कौटुंबिक वाद या घटनेला कारणीभूत ठरल्याची शक्यता पोलीस तपासात समोर येत असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

बाप, आई आणि मुलं... घरात आढळले चौघांचे मृतदेह... मुंबईचं नेव्हीनगर हादरलं
Mumbai Navy Nagar deathsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 1:48 PM
Share

Indian Navy Sailor Family Death Case : मुंबईच्या कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय नौदलातील 34 वर्षीय नाविक पुरनमल शंभूलाल मेहरा, त्याची 28 वर्षीय पत्नी ओमा आणि दोन मुलांचे मृतदेह सरकारी निवासस्थानी आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.

तीन वर्षाचा मुलगा यश आणि अवघ्या दोन महिन्याच्या मुलीचा मृतदेह बेडवर सापडला. तर पुरनमल यांनी गळफास घेतलेला होता. 15 ऑगस्टच्या रात्री कफ परेड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पुरनमलने फाशी घेऊन आत्महत्या केली. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू विष घेतल्याने झाला असावा. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण समजलं नाही. पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक चौकशीनंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे.

श्वास गुदमरला अन्…

घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. फॉरेन्सिक टीमने अख्ख घर शोधलं. पण घरात विष सापडलेलं नाहीये. जेजे रुग्णालयात झालेल्या पोस्टमार्टमनुसार पुरनमल यांचा मृत्यू फाशीमुळे श्वास गुदमरल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण ओमा आणि दोन मुलांचा मृत्यूवर मेडिकल टीमने केमिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच निष्कर्ष काढणार असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर गेल्या काही काळापासून पुरनमल यांच्या कुटुंबात वैवाहिक वाद होते असं समोर आलं आहे. पुरनमल आणि ओमाचं लग्न चार पाच वर्षापूर्वी झालं होतं. दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. एक आठवड्यापूर्वी ओमाचे वडील तिला मुंबईवरून गावाकडे घेऊन जायला आले होते. त्यावेळी ओमाला जायचं असेल तर जाऊ शकते. पण ती सोबत मुलांना घेऊन जाऊ शकत नाही, असं पुरनमल याने म्हटल्याचं समोर आलं आहे. पोलीस आता या कौटुंबिक वादाची माहिती घेऊन या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत.

वारंवार फोन नंतरही उत्तर नाही

सूत्रांच्या माहितीनुसार, पुरनमलच्या वडिलांनी त्यांना रात्री फोन केला होता. वारंवार फोन केल्यानंतरही कोणतंच उत्तर आलं नाही. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या कंट्रोल रूमला सूचना दिली. त्यानंतर नौदलाचे अधिकारी पुरनमलच्या सरकारी निवासस्थानी आले. तेव्हा त्यांना कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याचं दिसलं. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कफ परेड पोलिसांना माहिती दिली.

पुरनमल यांचं कुटुंब मूळचं राजस्थानचं राहणारं आहे. पुरनमलचा लहान भाऊही नौदलात तैनात आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तो मुंबईत आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच शेजारील लोक, नातेवाईक आणि इतरांच्या साक्षी पोलिसांनी नोंदवल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...