AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम, सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीची निर्मिती, नागरिकांकडून कौतुक

शेती करीत असताना सामान्य शेतकऱ्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यावर कायमचा तोडगा काढला असल्याचे वारंवार पाहण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम, सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीची निर्मिती, नागरिकांकडून कौतुक
solapur karmala solar boatImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 09, 2023 | 1:27 PM
Share

शितलकुमार मोटे, करमाळा : शेतकरी (Solapur farmer) हा अनंत अडचणीवर मात करून आपली शेती (farmer) करीत असतो. त्याचबरोबर मिळालेल्या पैशातून आपल्या परिवाराची काळजी घेत असतो. त्याचबरोबर शेतकरी प्रत्येकवेळी आपल्या कामात अधिक प्रयोग करीत असतो. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगली शेतीच्या फायद्याची उपकरण तयार केली आहेत. त्याचपद्धतीने करमाळा (karmala) तालुक्यातील भिवरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील श्रीहरी जाधव या उच्चशिक्षित तरुणाने संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी बोट विकसित केली आहे. या बोटीचा प्रवास यशस्वी ठरल्याने श्रीहरी जाधव यांचे करमाळा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

स्वतः सौरऊर्जेवर चालणारी बोट तयार केली

करमाळा तालुक्यातील भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, वांगी 1, 2, 3, शेलगाव,सांगवी, या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी तसेच वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी इंदापूरला जावे लागते. यासाठी टेंभुर्णी मार्गे 70 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. त्यावर मात करण्यासाठी सुरुवातीला सन 2019 मध्ये डिझेल इंजिनवरील बोट सेवा बंद पडली. यावर पर्याय म्हणून श्रीहरी जाधव यांनी सौरऊर्जेवरील सर्व साहित्य आणून स्वतः सौरऊर्जेवर चालणारी बोट तयार केली आहे. या बोटीच्या माध्यमातून ढोकरी (करमाळा) ते शहा (इंदापूर) या गावादरम्यान या बोटीने फेऱ्या मारण्यासाठी यशस्वी प्रवास केलेला आहे.त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ अधिक खूष आहेत.

पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करावी

शेती करीत असताना सामान्य शेतकऱ्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यावर कायमचा तोडगा काढला असल्याचे वारंवार पाहण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या काही मुलांनी पारंपारिक शेतीला छेद देत चांगल्या बागा फुलवल्या आहेत. त्याचबरोबर त्यातून लाखो रुपयांची कमाई सुध्दा केली आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करावी असा सल्ला सुध्दा तरुण देत आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष सरकारच्या मदतीकडे लागलं आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....