AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजारी नदी असूनही कडक उन्हामुळं उसाचं पीक करपलं, पीक वाया जात असल्यामुळे…

यंदा मान्सून यायला उशीर झाला आहे. त्याचबरोबर मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल येईल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत.

शेजारी नदी असूनही कडक उन्हामुळं उसाचं पीक करपलं, पीक वाया जात असल्यामुळे...
solapur farmer newsImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 16, 2023 | 1:03 PM
Share

सोलापूर : रब्बी आणि खरीप हंगाम वाया गेल्याची शेतकऱ्यांची (solapur farmer) सगळीकडं चर्चा सुरु आहे. यंदाचा उन्हाळा इतक कडकं होता की, शेतातली अनेक पीक करपली, अवकाळी पावसाने काही भागात पिकांना मदत केली. सोलापूरच्या माढ्यातील सीना नदी काठचा शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी महादेव लटके (mahadeo latake) असं त्यांचं नाव आहे. त्यांची नदीच्या शेजारी शेती आहे, परंतु कडकं उन्हामुळे नदीला पाणी नसून शेतकरी पावासाच्या प्रतिक्षेत आहे. शेतकरी महादेव लटके यांचं उसाचं पीक करपतं आहे. महाराष्ट्रात (maharashtra agricultural news) सुध्दा अनेक ठिकाणी फळ बागा पाण्याअभावी करपत आहेत.

ऊसाची शेती करपून चालल्याची स्थिती

सोलापूरच्या माढ्याच्या सीना नदी काठच्या शेतकऱ्यांची पाण्या अभावी पीकं वाया जात असल्याचं चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले असून, अद्यापही पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील ‘सीना नदीकाठचा’ ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नदीला पाणी नसल्यानं ऊसाची शेती करपून चालल्याची स्थिती आहे.

ऊस शेती नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे

काही शेतकऱ्यांनी तर ऊसाच्या शेतात चरायला जनावरे सोडल्याचे चित्र आहे.माढा तालुक्यातील केवड गावातील शेतकरी महादेव प्रल्हाद लटके यांच्याकडे ऊसाची शेती आहे. ही ऊस शेती नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून नदीला पाणी नाही. दुसरीकडे दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत चालली आहे. त्यामुळं ऊसाचे पिक करपू लागलं आहे.

त्यामुळं महादेव लटके यांनी आपल्या ऊसात जनावरे चरायला सोडली आहेत. पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. रब्बी आणि खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठी कमी होत असल्यामुळे नद्यांना आणि कॅनॉलमध्ये कमी पाणी सोडण्यात येत आहे. पाणीसाठी कमी असल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यातं आले आहे. त्याचबरोबर पावसाला सुरुवात झाल्याशिवाय पेरणी करु नये असं सुध्दा कृषी विभागाने जाहीर केलं आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...