AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय

दिवाळी सणामुळे जवळपास सर्वच लहान-मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत. अशातच सोयाबीनचे दर हे गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. कधी नव्हे ते या हंगामात सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. ऐन सणामध्ये तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने दर सुधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र, बाजार समित्या ह्या बंद असल्याने शेतीमालाची विक्री करावी कुठे हा प्रश्न कायम आहे.

सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 1:14 PM
Share

लातूर : दिवाळी सणामुळे जवळपास सर्वच लहान-मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत.  ( Soyabean Rate,) अशातच सोयाबीनचे दर हे गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. कधी नव्हे ते या हंगामात सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. ऐन सणामध्ये तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने दर सुधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र, (Bazar Simitee) बाजार समित्या ह्या बंद असल्याने शेतीमालाची विक्री करावी कुठे हा प्रश्न कायम आहे. पण ज्या ठिकाणी शेतकरी केंद्र किवां तेल प्रक्रिया उद्योग सुरु आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री शक्य आहे. मात्र, यंदाच्या हंगामात दर वाढले तर विक्रीसाठी मोकळीक नाही अशी अवस्था सोयाबीनची आहे.

गतआठवड्यात सोयाबीनचे दर हे 5 हजारापेक्षाही कमी झाले होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. परिणमी उडदाची आवक ही वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या दिवाळी सणामुळे बंद आहेत. तर सोयाबीनला 5 हजार 300 चा दर मिळत आहे. हाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बाजार समित्या बंद होण्यापूर्वी विक्रमी आवक

दिवाळीमुळे राज्यातील बाजार समित्या ह्या काही दिवस बंद राहतात. नाशिक बाजारपेठ ही सलग 10 दिवस बंद राहणार असल्याचे सुरवातीच्या काळात सांगण्यात आले होते. त्याचा परिणाम हा इतर बाजार समित्यांवर झाला होता. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 50 हजार पोत्यांची आवक झाली होती. तर दर हा सरासरी 5 हजार रुपये मिळाला होता.

मागणी वाढल्याने दरात वाढ

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शिवाय डाळीसाठ्यावरील निर्बंधाची मर्यादा ही संपलेली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग कारखान्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरु आहे. शिवाय सध्या सणामुळे तेलाच्या मागणीत वाढ झाल्यानेही दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे. सोयाबीनचे दर हे स्थिरच नाही तर सुधारत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता उंचालवलेल्या आहेत. हेच दर कायम राहण्याची आशा शेतरकरी बाळगत आहेत.

शुक्रवारपासून लातूर बाजार समिती होणार सुरु

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होणार आहे. मात्र, पाच दिवस बंद राहणारी बाजार समिती आता चक्क 10 दिवस बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. शुक्रवारी केवळ पाडव्याचे मुहूर्त म्हणून बाजार समिती ही सुरु राहणार आहे. तर पुन्हा शनिवारी व्यवहार हे बंद राहणार असून सोमवारपासून नियमित बाजार समिती ही सुरु राहणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनची विक्री करायची झाली तर शेतकऱ्यांना तेल विक्री प्लांटस् चा आधार घ्यावा लागणार आहे. (Soyabean prices stable, farmers have these options for sale)

संबंधित बातम्या :

किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात, संघर्ष दिंडीनंतर आता महामुक्काम

रब्बीचा ‘श्रीगणेशा’ केलाय, मग ‘ही’ काळजी घेतली तरच होईल पीकांचे उगवण..

पशुखाद्याच्या दरात वाढ, दूध दर घटल्याने शेतीचा मुख्य जोडव्यवसाय अडचणीत

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.