AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravikant Tupkar : मदत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा..! सरकारच्या भूमिकेवर ‘स्वाभिमानी’ आक्रमक

महागाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी यंदा चाढ्यावर मूठ ठेवली खरी मात्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Ravikant Tupkar : मदत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा..! सरकारच्या भूमिकेवर 'स्वाभिमानी' आक्रमक
रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 12:41 PM
Share

बुलडाणा : (Heavy Rain) अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. आता पूरस्थिती निर्माण होऊन 8 दिवसाचा कालावधी झाला. मात्र, केवळ पाहणी आणि आढावा ही औपचारिकता करण्यात आली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयाचीही (Financial assistance) आर्थिक मदत झालेली नाही. दोन दिवसांमध्ये (Farmer) शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये याप्रमाणे मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी

महागाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी यंदा चाढ्यावर मूठ ठेवली खरी मात्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. पाऊस होताच नुकसानीचा आढावा घेण्यात आला पण प्रत्यक्षात मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजर रुपये मदत देणे गरजेचे आहे.

…अन्यथा लोकप्रतिनिधींचे फिरणेही मुश्किल होईल

शेतकऱ्यांसाठी केवळ मोठ-मोठ्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम राहत आहेत. सध्या सबंध राज्यातील शेतकरी अडचणीत असताना त्याच्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे तर लोकप्रतिनीधी हे मंत्रिमंडळात वर्णी लागेल या आशेने मुंबई वारी करीत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत रक्कम मिळाली नाहीतर लोकप्रतिनिधींचे फिरणेही मुश्किल होईल. शिवाय जे परिणाम होतील त्यास शेतकरी जबाबदार राहणार नाही असे तुपकर यांनी ठणकावले आहे.

राज्य सरकार मंत्रिमंडळात व्यस्त

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची. यंदाच्या खरिपातून उत्पादन सोडा पण झालेला खर्चही निघतो की नाही अशी स्थिती आहे. असे असताना राज्य सरकार मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारात व्यस्त आहे. शेतकऱ्यांकडे असेच दुर्लक्ष होत गेले तर उद्या लोकप्रतनिधींना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.