AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : पावसाचा परिणाम थेट पीकविमा योजनेवर, शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा होणार का फायदा?

राज्यात सर्वाधिक खरीप पिकांचे नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यंदा पेरण्या लांबल्याने पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. त्याचाच फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे.

Nanded : पावसाचा परिणाम थेट पीकविमा योजनेवर, शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा होणार का फायदा?
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयImage Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 25, 2022 | 11:56 AM
Share

नांदेड : शेती व्यवसाय हा केवळ निसर्गावर अवलंबून आहे याचा प्रत्यय (Kharif Season) यंदाच्या खरिपातही आलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी पेरण्या रखडल्या तर पेरणी होताच अधिकच्या पावसाने (Crop Damage) पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी अविरत प्रयत्न करुन पेरणीच्या टक्केवारीत वाढ केली पण अनिश्चित व अनियमित मान्सूनने सबंध खरिपाचेच गणित बिघडले आहे. आता याचा परिणाम थेट केंद्राच्या (Crop Insurance Scheme) पीकविमा योजनेवर होत आहे. आता पाऊस आणि योजनेचा सबंध काय असा सवाल तु्हाला पडला असेल पण नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. त्यामुळे मुदत संपण्यापुर्वी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. शिवाय उर्वरित काळात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले आहे.

खरीप पिकांचे नुकसान

राज्यात सर्वाधिक खरीप पिकांचे नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यंदा पेरण्या लांबल्याने पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. त्याचाच फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे. पिकांचे नुकसान पाहता किमान विम्याच्या माध्यमातून तरी आर्थिक लाभ होईल ही आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

काय आहे योजनेची स्थिती?

पंतप्रधान पीकविमा योजना ही केंद्राच्या माध्यमातून सुरु असली तर राज्यात कृषी आणि महसूल विभागावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यंदा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे तर उर्वरित काळातही असाच ओघ राहील असा विश्वास आहे. तर राज्यात 39 लाख 21 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांना यापूर्वीच सहभाग नोंदवावा लागणार आहे.

शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्याचे कारण काय?

दरवर्षी शेतकरी हे विमा योजनेकडे पाठ फिरवत असतात. यंदा मात्र, स्थिती ही वेगळी आहे. कारण हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचे स्वरुप समोर आले आहे. शिवाय अजूनही पावसाचा धोका कायम आहे. पिके पाण्यात असून जर नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान झाले तर आर्थिक मदत ही मिळणार. त्यामुळे उत्पादनातून नाही किमान आर्थिक मदतीमधून तरी दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसानीच्या खुणा अधिक गडद असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय