AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?

रब्बी हंगामात हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरण यामुळे यंदा उत्पादन वाढणार हे निश्चित होते. केंद्र सरकारने तर यंदा देशात 131 लाख टन उत्पादन होईल असा अंदाजच वर्तवला होता. पण प्रत्यक्षात आता हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असून 80 ते 90 लाख टनाचे उत्पादन झाले आहे. मध्यंतरी कोरोना काळात नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यामुळे राज्यभर नाफेडने हमीभाव केंद्र उभारली आहेत. केंद्रावरील दर आणि बाजारपेठेतील दर यामध्ये 400 रुपयांचा फरक राहिलेला आहे.

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा 'आधार', उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 09, 2022 | 5:38 AM
Share

लातूर :  (Rabi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरण यामुळे यंदा उत्पादन वाढणार हे निश्चित होते. केंद्र सरकारने तर यंदा देशात 131 लाख टन उत्पादन होईल असा अंदाजच वर्तवला होता. पण प्रत्यक्षात आता (Chickpea Crop) हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असून 80 ते 90 लाख टनाचे उत्पादन झाले आहे. मध्यंतरी कोरोना काळात नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यामुळे राज्यभर (NAFED) नाफेडने हमीभाव केंद्र उभारली आहेत. केंद्रावरील दर आणि बाजारपेठेतील दर यामध्ये 400 रुपयांचा फरक राहिलेला आहे. हमीभाव केंद्रावर 400 रुपये अधिकचे मिळत आहेत. असे असले तरी हमीभाव केंद्रामुळेच बाजारपेठेत हे दर टिकून आहेत. शिवाय केंद्राने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्पादन झाले नसून भविष्यात मागणी वाढल्यास हरभऱ्याच्या दरातही वाढ होणार आहे.

नाफेडच्या माध्यमातून 3 लाख 71 हजार टन हरभऱ्याची खरेदी

राज्यात 1 फेब्रुवारीपासून हरभरा हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. हंगामाच्या सुरवातीला केंद्रावरील नोंदणी, विक्रीसाठी होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. पण आता शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात नाफेडकडे तब्बल 3 लाख 71 हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली आहे. सध्या हे प्रमाण कमी आहे. मात्र, बाजारपेठेतील अवस्था पाहता शेतकरी आता खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. शिवाय दरात तफावत असल्याने शेतकरी नोंदणी करुन विक्रीवर भर देत आहे. दरात असाच फरक राहिला तर शेतकरी आपली भूमिका बदलतील असा विश्वास कृषितज्ञांना आहे.

असे असतानाही शेतकऱ्यांचा विक्रीवर भर

यंदाच्या हंगामात उत्पादकता पाहून शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करायची की नाही याबाबत निर्णय घेतला आहे. सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटल्यामुळे दर वाढणार हे निश्चित होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली. त्यामुळेच हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना चित्र बदलले. पण रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात बदल होतील असे वातावरण नाही. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्रीवर भर देत आहे. पण काही दिवस अशी परस्थिती राहणार असून भविष्यात खरेदी केंद्रापेक्षा बाजारपेठेत हरभऱ्याला अधिकचा दर राहिल असा अंदाज आहे.

खरेदी केंद्र आणि बाजारपेठेतील दर

नाफेडच्या माध्यमातून राज्यात हरभरा खरेदी केंद्रन सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सुरु होताच नोंदणीला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे बाजारपेठेत हंगामाच्या सुरवातीला 4 हजार 500 असा दर होता. यामध्ये सुधारणा होत गेली असून बाजारपेठेत 4 हजार 700 पर्यंत दर गेले आहेत. 200 रुपयांपेक्षा अधिक तफावत असल्यास शेतकरी खरेदी केंद्राचा आधार घेतात. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेतीलही दर वाढतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

Excess sugarcane: साखर आयुक्तांच्या सूचना अन् गावस्तरावर अंमलबजावणी, लागेल का अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली!

Onion Market : उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

Nandurbar Market: युध्द रशिया-युक्रेन युध्दाचा फायदा धुळ्याच्या शेतकऱ्याला, 973 च्या वाणाच्या गव्हाला विक्रमी दर

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद