AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brand Story : बँकेची नोकरी सोडून दोन भाऊ आले शेतीत, आता झाले मिलियन डॉलर कंपनीचे मालक

सत्यजित आणि अजिंक्य यांनी शेतीत नवा मार्ग स्वीकारला. त्यांनी नोकरी सोडून शेतीत आपलं स्वप्न साकार केलं.

Brand Story : बँकेची नोकरी सोडून दोन भाऊ आले शेतीत, आता झाले मिलियन डॉलर कंपनीचे मालक
| Updated on: Jun 25, 2023 | 2:50 PM
Share

पुणे : पुण्यात राहणारे सत्यजित आणि अजिंक्य हे दोन भाऊ. त्यांनी आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारला. युवकांसाठी प्रेरणास्थान झाले. टू ब्रदर्स ही त्यांची कंपनी ४ मिलीयन डॉलर्सचा टर्नओव्हर करत आहे. वार्षिक १२ कोटींचा व्यवसाय करते. सत्यजित आणि अजिंक्य यांनी कंपनी बनवण्यासाठी बँकेतील नोकरी सोडली. २०१४ मध्ये पुण्याजवळ भोदानी गावात टू ब्रदर्स सेंद्रीय शेती नावाने सेंद्रीय शेती सुरू केली. पूर्णवेळ शेतीत उतरण्याचा संकल्प केला.

टू ब्रदर्स सुरू करण्यापूर्वी बँकेत नोकरी

अजिंक्य कम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर आहे. इंदिरा कॉलेज पुणे येथून त्यांनी एमबीए केलं आहे. त्यानंतर त्यांनी एचडीएफसी आणि एचएसबीसी यासारख्या कंपन्यांमध्ये ४ वर्षे बँकेत काम केलं. त्यांचे मोठे भाऊ सत्यजित अर्थशास्त्रात बी. ए. आहेत. त्यांच्याकडेही एमबीएची डिग्री आहे. सत्यजित यांनी सुमारे दहा वर्षे बँकिंग क्षेत्रात कोटक लाईफ इन्शूरन्स, सिटीकार्प फायनन्स आणि डीबीएससारख्या कंपन्यांमध्ये काम केलं.

टू ब्रदर्स सेंद्रीय शेतीचं काम काय?

सत्यजित आणि अजिंक्य टू ब्रदर्सच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या पद्धती सांगतात. मशीनचा वापर न करता अधिक उत्पादन कसं घेतलं जाऊ शकते, हे सांगतात. दोघेही भाऊ शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करायला सांगतात. यातून शेतकऱ्यांना फायदा होतो.

टू ब्रदर्स हे एक ऑनलाईन वस्तू विक्री करण्याचे माध्यम आहे. तूप, मुंगफल्ली, मुंगफल्लीचा तेल, पारंपरिक गव्हाची कणीक विक्री करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं त्यांच्याशी जुळले आहेत.

९ हजार शेतकरी जुळले

सेंद्रीय शेती क्लब सुरू करण्यासाठी त्यांनी पुण्यातील शाळांमध्ये कार्यक्रम सुरू केला. ९ हजार शेतकरी त्यांच्यापासून प्रेरित झाले. दोन्ही भावांनी बऱ्याच शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीची पद्धती समजावून सांगितली. आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, असं सत्यजित यांचं म्हणणं आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी याचा विचार करायला हवा. शेतीतूनही चांगले उत्पन्न काढता येऊ शकते. यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.