AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावांना चक्रीवादळाचा फटका, केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यामुळे…

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या गावांना चक्रीवादळाचा फटका, केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यामुळे...
banana
| Updated on: May 29, 2023 | 12:15 PM
Share

जळगाव : काल रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे (heavy rain) रावेर तालुक्यातील अहिरवाडी, पाडला, खानापूर तसेच मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील अनेक गावांना या चक्रीवादळाचा फटका बसलाय आहे. केळी उत्पादक शेतकरी (maharashtra farmer news) मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. कापणीवर आलेल्या केळी बागा (banana cultivation) जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी (unseasonal rain) केली आहे.

पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसानं मात्र उसंत घेतली नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. हवामान विभागानं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असून काल दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं आहे. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापणीला आलेले धान या गारपीटमुळे अक्षरश: धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेती ही नष्ट झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडून पडल्याने काही ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

उन्हाळी पिके वाचवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक

सीना कोळगाव धरणातून भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत करमाळा तालुक्यातील आवाटी व नेरले येथील सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालय परंडा यांना निवेदन दिले असून याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोत्रा बंधाऱ्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पिक, ऊस, भुईमूग, या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या बंधाऱ्यावर आवाटी, रोसा, नेरले, भोत्रा, मुंगशी, लोणी, परंडा आदी गावचे या लाभक्षेत्रात येत आहेत. या बंधाऱ्यावर 383 हेक्टर एवढे आहे. आज रोजी नदी व बंधारा कोरडा पडला असून उन्हाळी पिके वाचवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.