AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paddy Crop : बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये घट, धान उत्पादक शेतकऱ्यांनो पुन्हा तीच चूक नका करु..!

तांदळाच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि रासायनिक खताचा डोस महत्वाचा आहे. पण आता शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी खताचा अतिरेक वापर करतात. पण शेतकऱ्यांचा हाच निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे.रसायनमु्क्त उत्पादनाची मागणी होत असताना दुसरीकडे धान उत्पादनासाठी खताचा वापर वाढत जात आहे.

Paddy Crop : बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये घट, धान उत्पादक शेतकऱ्यांनो पुन्हा तीच चूक नका करु..!
बासमती तांदळाच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 14, 2022 | 3:35 PM
Share

मुंबई : चार महिन्यापूर्वी (Rice Export) बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले होते. पण आता याच तांदळाला नाकारले जात आहे. नेमके बासमती तांदळाच्या बाबतीत असे का होत आहे याचा शोध कृषी तज्ञांनी घेतल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले आहे. किटकनाशकाच्या अति वापरामुळे ही परस्थिती ओढावली आहे. केवळ वापरच नियंत्रणात यावे असे नाहीतर (Fertilizer) खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांनीही यामध्ये अमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. सध्या (Kharif Season) खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीची लगबग सुरु आहे. असे असताना शेतकऱ्यांनी योग्य खताचा आणि मर्यादित वापर करणे हाच एकमेव पर्याय आहे. अन्यथा भविष्यात बासमती तांदूळ उत्पादकांचे आणखीन नुकसान होणार आहे. कीटकनाशकांच्या वापरामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 2018-19 मध्ये 32 हजार 804 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात झाली होती. तर गतवर्षी 26 हजार 861 कोटी रुपयांचा तांदूळ हा निर्यात झाला होता. तांदळाच्या निर्यातीसाठी त्याचा दर्जा हा खूप महत्वाचा आहे. बासमतीच्या 1 हजार 128 नमुन्यांपैकी 45 प्रकारामध्ये कीटकनाशकांचा वापर अधिक असल्याचे समोर आले आहे.

पाण्याचे व्यवस्थापन अन् संतुलित युरिया हाच पर्याय

तांदळाच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि रासायनिक खताचा डोस महत्वाचा आहे. पण आता शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी खताचा अतिरेक वापर करतात. पण शेतकऱ्यांचा हाच निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे.रसायनमु्क्त उत्पादनाची मागणी होत असताना दुसरीकडे धान उत्पादनासाठी खताचा वापर वाढत जात आहे. त्यामुळे बासमती तांदळाकडे निर्यातदार पाठ फिरवत आहेत. त्यामुळे खताचा वापर हा नियंत्रित असणे गरजेचे असल्याचे बासमती एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे डॉ. रितेश शर्मा यांनी सांगितले आहे.

शेतकरीही यापासुन अनभिज्ञ

किटकनाशकांच्या अतिवापरामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकरी हे नियमित खताचा वापर करीत राहिले. त्यामुळेच अधिकचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना संबंधित यंत्रणने ही माहितील दिली असती तर गतवर्षी खताचा वापर नियंत्रणात झाला असता. शिवाय शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले तर नुकसान तर टळणार शिवाय उत्पादनात वाढ ही झाली असते.

बासमती तांदळाचे हे आहेत वाण

भारतीय कृषी संशोधन संस्थेने आतापर्यंत बासमती तांदळाच्या तीन रोग प्रतिबंधक जाती विकसीत कऱण्यात आल्या आहेत. यामध्ये 1401 या तांदळाच्या जातीमध्ये सुधारणा करुन आता 1886 ही नवीन जात तयार करण्यात आली आहे. 1509 या तांदळाच्या वाणामध्ये सुधारणा करुन 1847 हे वाण विकसित करण्यात आले आहे. तर 1885 मध्ये बासमती तयार करण्यात आला आहे. या वाणाच्या तांदळामध्ये कीटकनाशकांचा वापरच करयाचा नाही. अन्यथा खर्च करुनही त्याची निर्यात न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे ह्या नवीन तीन वाणावर लक्ष केंद्रीत कऱणे गरजेचे आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.