AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : शेतकऱ्यांनो पेरणीला पोषक वातावरण, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् ‘श्रीगणेशा’ करा

यंदा पाऊस लांबला असल्याने केवळ राज्यातच नाहीतर मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तूर, उडीद आणि मुगाचा पेऱ्याकडे आता शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होणार असून सोयाबीनवरच भर राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असली तरी अनेकांनी पावसाची प्रतिक्षा करीत चाढ्यावर मूठ ही ठेवलेलीच नाही. पण कापूस लागवडीवर मात्र शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे.

Kharif Season : शेतकऱ्यांनो पेरणीला पोषक वातावरण, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् 'श्रीगणेशा' करा
राज्यात सर्वदूर पावसाला सुरवात झाली असून खरिपासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 23, 2022 | 9:32 AM
Share

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या (Kharif Season) खरीप पेरण्या 15 दिवसांनी लांबलेल्या आहेत. यामुळे कडधान्य वगळता इतर पिकांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र, आता (Climate Change) मान्सून आपली कूस बदलत असून मराठवाड्यासह विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण झाले असले तरी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे आवाहन केले आहे. हंगामाच्या सुरवातीपासून (Agricultural Department) कृषी विभागाच्यावतीने हेच आवाहन केले जात असले तरी अनेकांनी धूपेरणी करुन दुबार पेरणीचे संकट ओढावून घेतले आहे. पण गेल्या दोन दिवसांपसून वातावरणात झालेला बदल हा आशादायी ठरत आहे.

खरिपाचे चित्र काय ?

यंदा पाऊस लांबला असल्याने केवळ राज्यातच नाहीतर मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तूर, उडीद आणि मुगाचा पेऱ्याकडे आता शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होणार असून सोयाबीनवरच भर राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असली तरी अनेकांनी पावसाची प्रतिक्षा करीत चाढ्यावर मूठ ही ठेवलेलीच नाही. पण कापूस लागवडीवर मात्र शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. उत्पादनात वाढ आणि बाजारपेठेतील दराचा फायदा व्हावा यासाठी कापूस लागवड करण्यात आली होती. पण पावसाने ओढ दिल्याने या क्षेत्रावरही दुबार पेरणी करावी लागणार आहे. एकंदरीत उशिरा का होईना खरिपासाठी पोषक वातावरण झाले असून राज्यभरात आठवड्यात पेरणी कामे अधिक गतीने होतील असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांचा भर कापूस, सोयाबीनवरच

खरीप हंगामात तेलबियांबरोबर कडधान्यावरही शेतकऱ्यांचा भर असतो. असे असले तरी राज्यातील शेतकरी हे सोयाबीन आणि कापसाचीच अधिक प्रमाणात लागवड करतात. पण यंदा निसर्गावर आधारित पेरणीचे स्वरुप राहणार आहे. सध्याच्या स्थितीमुळे कडधान्याचा पेरा उशीरा केल्यास अपेक्षित उतारा मिळत नाही. त्यामुळे आता तूर, उडीद आणि मुगाचा विषय संपल्यात जमा आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

कृषी विभागाचा काय आहे सल्ला ?

खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत.असे असले तरी यंदा यामध्ये बदल करावा लागला आहे. लांबलेल्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरणी न करता किमान 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहानाला प्रतिसाद दिला असला तरी धूळपेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Follow Us
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल