AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, अडीच वर्षाचा फॉर्म्युला नकोच : मित्रपक्ष

भाजप-शिवसेनेची मुख्यमंत्रिपदावरुन (Aditya Thackeray chief minister post) खेचाखेची सुरु असताना, तिकडे मित्रपक्षांनी बैठक घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, अडीच वर्षाचा फॉर्म्युला नकोच : मित्रपक्ष
| Edited By: | Updated on: Oct 31, 2019 | 1:02 PM
Share

मुंबई : भाजप-शिवसेनेची मुख्यमंत्रिपदावरुन (Aditya Thackeray chief minister post) खेचाखेची सुरु असताना, तिकडे मित्रपक्षांनी बैठक घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत. पाच वर्षांसाठी तेच मुख्यमंत्री(Aditya Thackeray chief minister post) असावेत, तसंच मित्रपक्षांना मंत्रिपदं द्या, अशी मागण्या रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

युतीतील घटक पक्षांचे नेते रामदास आठवले, अविनाश महातेकर, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची बैठक झाली. या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत घटकपक्षांच्या मागण्या मांडल्या.

“आमचा पक्ष, जानकर यांचा पक्ष, सदाभाऊ खोत आम्ही सर्व भाजपसोबत आहोत. आम्हाला दोन मंत्रिपदे मिळाली होती. शेवटी शेवटी आरपीआयला मंत्रिपद मिळालं. विनायक मेटे यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे सर्व मित्रपक्षांच्या वाट्याला मंत्रिपद यावं”, असं आठवले म्हणाले.

“आता निवडून येण्याचं प्रमाण जास्त आहे. कोणताच पक्ष 100 च्या पुढे गेला नव्हता. पण भाजप 100 च्या वर गेला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व धुरा होती. काल देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाली आहे. त्याचा ठरावही केला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकरात निर्णय घ्यावा”, असं रामदास आठवले यांनी नमूद केलं.

“आम्हाला चारही पक्षांना मंत्रिपद मिळावीत. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहोत. चौघांना मंत्रिपदं मागितली तर एक पण मिळणार नाही. भाजपचे 120 आमदार झालेत. मागच्या वेळेप्रमाणे सेनेला 15 मंत्रिपदे देण्याची शक्यता. आणखी काही महत्वाची खाती देतील”, असं आठवले म्हणाले.

अमित शहा लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यानंतर प्रश्न मिटणार आहे. आमचे मित्र पक्षाचे 7 आमदार आहेत. घटक पक्षांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत असं वाटतं. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच नाही. अडीच वर्षाचा फॉर्म्युला आम्हाला मंजूर नाही, पाच वर्षाचाच फॉर्म्युला योग्य आहे, असंही आठवलेंनी सांगितलं. 105 भाजप, 7 मित्रपक्ष, 8 अपक्ष यांच्यामुळे भाजपचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...