AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Tracing : कार चोरीचे नो टेन्शन! चोरटे रंगेहाथ पकडले जाणार, केंद्र सरकारचा काय आहे जबरा प्लॅन

Car Tracing : दरवर्षी देशात हजारो कार लंपास होतात. पार्किंगमधून कार चोरी होतात. पण त्याचा लवकर काही थांगपत्ता लागत नाही. या कारचे पार्टस करुन ते विक्री होतात. पण आता लवकरच केंद्र सरकार या चोरांना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. काय आहे जबरदस्त योजना

Car Tracing : कार चोरीचे नो टेन्शन! चोरटे रंगेहाथ पकडले जाणार, केंद्र सरकारचा काय आहे जबरा प्लॅन
| Updated on: Apr 05, 2023 | 6:52 PM
Share

नवी दिल्ली : कार मालकांसाठी चांगली बातमी आहे. जर तुमची चार चाकी चोरीला गेली तर ही कार परत तुम्हाला मिळू शकते. रवर्षी देशात हजारो कार लंपास होतात. पार्किंगमधून कार चोरी होतात. पण त्याचा लवकर काही थांगपत्ता लागत नाही. या कारचे पार्टस करुन ते विक्री होतात. पण आता लवकरच केंद्र सरकार या चोरांना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी केंद्र सरकार खास ट्रॅकिंग सिस्टमवर (Stolen Car Tracking System) काम करत आहे. त्यामुळे चोरी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तिचा तपास सुरु होईल. यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने एक प्रस्ताव पण तयार केला आहे. देशात वर्षाला जवळपास 2.5 लाख कार चोरी होतात. त्यामुळे हा केंद्र सरकार (Central Government) यावर गांभीर्याने विचार करत आहे.

2.5 लाख कार चोरी

देशात दरवर्षी जवळपास 2.5 लाख कार चोरी होतात. या आकडेवारीवरुन तुम्हाला याचे गांभीर्य लक्षात येईल. सर्वाधिक वाहन चोरी तीन राज्यात होते. त्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. दिल्लीत जवळपास 38 हजार, उत्तर प्रदेशमध्ये 34 हजार, महाराष्ट्रात जवळपास 22 हजार कार चोरी जातात. पोलीस यामधील केवळ 400 कारचा शोध लावण्यात यशस्वी होतात.

अत्याधुनिक यंत्रणा कामाला

देशात वर्षाला जवळपास 2.5 लाख कार चोरी होतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, एंटी थेफ्ट डिव्हायसेस आणि इतर आयुधे असतानाही चारचाकीची चोरी होते. विक्री होते. मुळ मालकाला त्याची कार कधीच परत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आता अत्याधुनिक यंत्रणा वापरणार आहे. त्यासाठी ट्रॅकिंग सिस्टम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कार चोरीला जाताच पोलीस ही कार तात्काळ शोधू शकतील.

विविध विभाग मदतीला

नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन सिक्युरिटीने (NCCS) वाहनांच्या ट्रॅकिंगसाठी अत्याधुनिक यंत्र तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव टेलिकम्युनिकेशन सिक्युरिटी इन्शुरन्सने (ITSAR) तयार केला आहे. याप्रकरणी 21 एप्रिलपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. हे अत्याधुनिक यंत्र तयार करण्यासाठी कंपन्या, ॲप्लिकेशन सेवा पुरवठादार आणि इतर तज्ज्ञांचा सल्ला मागविण्यात आला आहे.

काम अति जलद

ही सिस्टम अत्यंत जलद प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे कार चोरीचा एफआयआर फाटल्यानंतर लागलीच कार शोधण्याची प्रक्रिया अति जलद सुरु करण्यात येईल. नवीन वाहन ट्रेकिंग डिव्हाईस ग्लोबल नेव्हिगेशन सेटेलाईट सिस्टिमचा (GNSS) वापर करणार आहे. त्यामुळे तात्काळ वाहनाची सद्यस्थितीची माहिती समोर येईल.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.