AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारचा लुक..मायलेज..नव्हे तर या गोष्टीला प्राधान्य देतात ग्राहक, सर्वेक्षणात आश्चर्यकारक बाब उघड

पूर्वी कार किंवा अगदी बाईक घेतानाही कितना देती है ? म्हणजे मायलेज किती देते असे विचायचे. आता मात्र कार विकत घेताना त्यात सेफ्टी किती आहे ते पाहिले जात आहे.

कारचा लुक..मायलेज..नव्हे तर या गोष्टीला प्राधान्य देतात ग्राहक, सर्वेक्षणात आश्चर्यकारक बाब उघड
CAR SAFETY
| Updated on: Jun 29, 2023 | 6:14 PM
Share

दिल्ली : पूर्वी कार विकत घेताना मायलेज किती देते हा प्रश्न ग्राहक ( Consumer ) विचारायचे. आता कार खरेदी करण्यामागचे लोकांचे प्राधान्यक्रम बदलेले आहेत. आता लोक कारचा लूक, डीझाईन आणि मायलेज ( Mileage ) शिवाय वाहनामध्ये काय सेफ्टी फिचर्स ( Safety Features ) दिले आहेत त्यावर जास्त लक्ष देत आहेत. अलिकडे केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. अलिकडेच केलेल्या पाहणीत 10 पैकी 9 लोकांनी कारच्या सुरक्षा रेटींगला महत्वाचे स्थान दिले आहे. म्हणजे चांगल्या सेफ्टी फिचर्स असलेल्या गाड्यांनाच आता मागणी आहे.

अलिकडे स्कोडा ऑटो इंडीया संघटनेने NIQ BASES द्वारा पाहणी केली. त्यानूसार भारतीय कार खरेदी करताना दोन गोष्टीची काळजी घेतात. एक आहे कारची क्रॅश टेस्टींग रेटींग आणि दुसरी बाब म्हणजे वाहनात एअरबॅगची संख्या किती आहे. तर कारचे मायलेज स्थान आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.

काय म्हणतो हा सर्वे 

या सर्वेक्षणात जवळपास 67 टक्के लोकांचा समावेश होता, ज्यांच्याकडे सुमारे पाच लाख रुपयांची कार आहे. तर 33 टक्के असे लोक होते, ज्यांचे कडे कार नाही परंतू ती खरेदी करण्याची इच्छा आहे. या सर्वेत 18 पासून 54 वयोगटातील लोकांचा समावेश होता. यात 80 टक्के उत्तरदेणारे पुरुष तर 20 टक्के महिला होत्या. सर्वात अधिक 22.2 टक्के लोकांनी कारच्या क्रॅश रेटींगला जास्त महत्व दिले. तर 21.6 टक्के लोकांनी कारमध्ये एअरबॅगना महत्व दिले. तर 15 टक्के लोकांनी मायलेजला महत्व दिले.

पूर्वी मायलेजला महत्व

पूर्वी लोक कारच्या मायलेजला जास्त महत्व द्यायचे. आता पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती गगनाला भिडल्या तरी लोक सेफ्टीला महत्व देत आहेत. कारच्या क्रॅश रेटींग बाबत दिलेले प्राधान्य पाहिले तर 5 स्टार रेटींगला कमाल 22.2 टक्के लोकांनी रस दाखविला, तर 4 स्टार रेटींगला 21.3 टक्के लोकांना रुची दाखविली, तर झीरो स्टार रेटींगला केवळ 6.8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

सुरक्षा आणि सेफ्टी रेटींग्सला महत्व

या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे की वाहनांची सुरक्षा आणि सेफ्टी रेटींग्सला लोक जास्त महत्व देत आहेत. क्रॅश रेटींगला ग्राहकांनी आपला प्राधान्यक्रम दिला आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 10 राज्यातील 1,000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील ग्राहकांचा समावेश करण्यात आला असल्याचे प्रादेशिक संचालक अमृता श्रीवास्तव यांनी सांगितले.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...