AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kia च्या कारमधील एअरबॅग फुसकी? कंपनीने 4 लाख गाड्या परत मागवल्या

लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये एअरबॅग्ज दिल्या जातात. या एअरबॅग्ज रस्ते अपघातावेळी कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवतात. हल्ली बहुतांश वाहनांमध्ये एअरबॅग येऊ लागल्या आहेत. केंद्र सरकारही सातत्याने एअरबॅग्सबद्दलचे नियम कठोर करत आहे.

Kia च्या कारमधील एअरबॅग फुसकी? कंपनीने 4 लाख गाड्या परत मागवल्या
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 12:00 PM
Share

मुंबई : लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये एअरबॅग्ज दिल्या जातात. या एअरबॅग्ज रस्ते अपघातावेळी कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवतात. हल्ली बहुतांश वाहनांमध्ये एअरबॅग येऊ लागल्या आहेत. केंद्र सरकारही सातत्याने एअरबॅग्सबद्दलचे नियम कठोर करत आहे. पण जर एअरबॅगमध्येच दोष असेल तर? एअरबॅगमध्ये दोष आढळल्याने किया (Kia) कंपनीने आपल्या 4.10 लाख गाड्या परत मागवल्या आहेत. अपघाताच्या वेळी एअरबॅग न उघडण्याच्या भीतीने त्यांनी या गाड्या परत मागवल्या आहेत. किआच्या अनेक गाड्या या मोठ्या रिकॉलमध्ये सामील आहेत, ज्यात ईव्ही कारचादेखील (EV car) समावेश आहे. Kia ने आतापर्यंत भारतात चार कार सादर केल्या आहेत आणि त्या ह्युंडई (Hyundai) आणि मारुती (Maruti) सारख्या ब्रँडशी स्पर्धा करतात.

2017 Kia Forte Coupe , 2017-18 किआ फोर्टेस, 2017-19 किआ सेडोनास, 2017-19 किआ सोल आणि 2017-19 किआ सोल ईव्ही या गाड्यांचा या रिकॉलमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वाहनांमधील एअरबॅग कंट्रोल युनिट प्रिंटेड सर्किट बोर्डवरील मेमरी चिपच्या संपर्कात येऊन इलेक्ट्रिकल सर्किट खराब करू शकते. अशा परिस्थितीत, टक्करीदरम्यान (धडक) एअरबॅग सक्रिय होणार नाहीत, ज्यामुळे अपघातात कारचालक आणि प्रवासी जखमी होण्याची शक्यता वाढते. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाच्या मदतीने ही माहिती मिळाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात उपलब्ध असलेल्या कार या रिकॉलमध्ये समाविष्ट नाहीत.

सर्व प्रभावित Kia वाहनांचे मालक त्यांची कार जवळच्या डीलरकडे घेऊन जाऊ शकतात आणि त्यांचे वाहन तपासू शकतात. तपासणी दरम्यान, एअरबॅग कंट्रोल युनिटचे निरीक्षण केले जाईल आणि हे युनिट बदलण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम विनामूल्य केले जाईल. याशिवाय ग्राहक 31 मार्चपर्यंत Kia च्या अधिकृत ग्राहक सेवेवर कॉल करून त्यांचे वाहन तपासण्यासाठी टाईम बुक करू शकतात.

एअरबॅग्जबद्दल केंद्र सरकारची कठोर पावलं

या महिन्यात, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केले आहे की, 8 प्रवासी क्षमता असलेल्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या GSR अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. M1 वाहन श्रेणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण पुढील आणि मागील रांगेतील प्रवाशांसाठी चार अतिरिक्त एअरबॅग प्रदान करणे बंधनकारक आहे, जेणेकरुन कार पुढच्या बाजूने कुठेही धडकली अथवा कारला मागून कोणत्याही वाहनाने धडक दिली तर त्या टक्करीचा प्रभाव कमी करता येईल.

या वाहनांमध्ये टू/साइड टोरसो एअरबॅग्ज आणि टू साइड कर्टेन/ट्यूब एअरबॅग्ज मिळतील. या एअरबॅग्जमुळे कारमधील सर्व प्रवाशांना संरक्षण मिळेल ज्यामुळे त्यांना सुरक्षितता मिळेल. भारतातील मोटार वाहने पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

इतर बातम्या

Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनं कमी व्याजदरासह खरेदी करता येणार? अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी SMEV मागण्या सादर

Budget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार? Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

(Kia recalls more than 410000 vehicles over airbags may not deploy)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.