AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2025: 12 लाखांपेक्षा ‘इतके’ जास्त उत्पन्न असलेल्यांनाही नो टॅक्स, नेमकं गणित काय?

आता 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. नवीन कर व्यवस्थेअंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. हा लाभ फक्त जे नवीन कर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करतात त्यांनाच लागू असणार आहे.

Union Budget 2025: 12 लाखांपेक्षा 'इतके' जास्त उत्पन्न असलेल्यांनाही नो टॅक्स, नेमकं गणित काय?
tax
| Updated on: Feb 01, 2025 | 1:34 PM
Share

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गींना मोठं गिफ्ट देण्यात आले. निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. नवीन कर व्यवस्थेअंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. हा लाभ फक्त जे नवीन कर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करतात त्यांनाच लागू असणार आहे.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण संपतेवेळी एक मोठी गुडन्यूज दिली. निर्मला सीतारामन यांनी 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. पण देशभरातील नोकरदार वर्गाला 12 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेले उत्पन्नही आता टॅक्स फ्री असणार आहे. नवीन आयकर प्रणालीनुसार, नोकरदार वर्गाला 75 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन असणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न 12 लाख आहे त्यांना 12 लाख आणि 75000 हजार रुपये अशा एकूण 12.75 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. यामुळे नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

4 लाखांपर्यंत करमुक्त

गेल्यावर्षी 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. यंदा नवीन आयकर प्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता 4 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर एक रुपयाही भरावा लागणार नाही. पण ही घोषणा केवळ नवीन आयकर प्रणालीनुसार कर जमा करणाऱ्या करदात्यांनाच मिळणार आहे.

नवीन कर रचना कशी?

उत्पन्न कर
0 ते 12 लाखांपर्यंत कर नाही
12 ते 16 लाखांपर्यंत 15 टक्के
16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के
20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के

आयकर कायद्यात होणार बदल

सध्या देशात 1961 चा आयकर कायदा लागू आहे. 2020 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय सरकारने नवीन कर व्यवस्था लागू केली होती. पण जुलै 2024 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की, देशातील आयकर कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात आयकराशी संबंधित एक नवीन विधेयक सादर केले जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत नवीन प्राप्तिकर कायदा पुढील आठवड्यात सादर केला जाईल. हा एक नवीन कायदा असेल, विद्यमान कायद्यात सुधारणा नाही.

Follow Us
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद