AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो.

Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 11:16 AM
Share

नवी दिल्ली: निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प (Budget 2022) हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत चर्चेत सहभागी व्हावे. चांगल्या हेतूने आणि चांगल्या मनाने चर्चा करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सर्व खासदारांना केलं. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मीडियाशी संबोधित करताना सर्व खासदारांना हे आवाहन केलं आहे. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील (india) लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. आज बजेट सत्र सुरू होत आहे. मी सर्वांचं देशातील सर्व खासदारांचं या बजेट सत्रात स्वागत करतो. आजच्या वैश्विक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे. या सत्रात खासदारांनी मांडलेलं त्यांचं म्हणणं, त्यांच्या चर्चाचे मुद्दे, मोकळ्या मनाने करण्यात आलेली चर्चा आदी गोष्टी वैश्विक प्रभावाची संधी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.

मानवीय संवेदनेतून चर्चा व्हावी

या अधिवेशनात सर्व खासदार सर्व राजकीय पक्ष मोकळ्या मनाने उत्तम चर्चा करून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यात, गती देण्यास मदत करतील, अशी आशा करतो. वारंवार निवडणुकांमुळे अधिवेशनावर त्याचा परिणाम होतो आणि चर्चांवरही परिणाम होत असतो, हे खरं आहे. पण सर्व खासदारांना विनंती आहे की, निवडणुका आपल्या जागेवर आहेत. त्या येत जात राहतील. पण सभागृहात अर्थसंकल्पातून संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा मांडला जातो. त्यासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. आपण सर्व कटिबद्धतेने हे सत्र फलदायी बनवलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात आपण आर्थिक उंची गाठण्याची संधी मिळेल, असं त्यांन सांगितलं. या अधिवेशनात मुक्त चर्चा व्हावी, मानवीय संवेदनेतून चर्चा व्हावी, चांगल्या हेतूने चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करतील इकोनॉमिक सर्वे, GDP अनुमानावर लागल्या आहेत सर्वांच्या नजरा

BUDGET 2022 JOB SEEKER : विपुलच्या नोकरीच्या शोध संपेल ? काय आहेत नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.