AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खात्यातून पैसे कट झाले, पण हातात मिळाले नाही, सर्वात अगोदर ‘हे’ काम करा

एटीएममधील बिघाड किंवा इतर कारणांमुळे दररोज असे प्रकार होतात आणि मोठा व्यवहार असेल तर मनात भीती निर्माण होते. त्यातली त्यात रविवारचा दिवस असेल तर बँकेत जाऊनही चौकशी करता येत नाही. पण अशा वेळी शांतपणे विचार करुन नियम माहित करुण घेणं गरजेचं आहे.

खात्यातून पैसे कट झाले, पण हातात मिळाले नाही, सर्वात अगोदर 'हे' काम करा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 20, 2019 | 9:32 PM
Share

ATM transaction failed but money deducted : एटीएमचा व्यवहार (ATM transaction) करताना अनेकदा खात्यातून पैसे वजा (Money deducted) झाल्याचा मेसेज येतो, पण हातात पैसे पडलेले नसतात. एटीएममधील बिघाड किंवा इतर कारणांमुळे दररोज असे प्रकार होतात आणि मोठा व्यवहार असेल तर मनात भीती निर्माण होते. त्यातली त्यात रविवारचा दिवस असेल तर बँकेत जाऊनही चौकशी करता येत नाही. पण अशा वेळी शांतपणे विचार करुन नियम माहित करुण घेणं गरजेचं आहे. कारण, तुमचे पैसे कुठेही जाऊ शकत नाहीत. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियमही  (RBI rules about ATM transaction) माहित असणं गरजेचं आहे.

रिझर्व्ह बँकेचा नियम काय सांगतो?

एटीएम व्यवहार ((ATM transaction) ) करणाऱ्या ग्राहकांना सर्वात अगोदर आरबीआयचा नियम माहित असणं गरजेचं आहे. एटीएममधून पैसे काढताना, पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण पैसे तुमच्या हातात आले नसतील, तर पैसे निश्चितपणे मिळतील. पण यासाठी काही अटीही आहेत, ज्या लक्षात न ठेवल्यास तुम्ही पैसे गमावू शकता.

एटीएममधून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण हातात पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. बँकेला सुट्टी असेल, तर कस्टमर केअरला फोन लावून माहिती देता येईल. प्रत्येक बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर इंटरनेटवरही सहजपणे मिळू शकेल.

ट्रान्झॅक्शन फेल का झालं याचं कारण तर तुम्हाला सांगितलं जाईलच, पण तुमचे पैसेही परत मिळतील. पैसे परत मिळण्यासाठी साधारणपणे एक आठवड्याचा वेळ लागतो. अनेक बँकांचे पैसे त्याअगोदरही मिळतात. ट्रान्झॅक्शन फेल झाल्याची स्लीप मिळते, जी तुम्हाला पैसे परत मिळेपर्यंत सांभाळून ठेवावी लागेल. काही एटीएममधून स्लीप येत नाही. अशा वेळी बँक स्टेटमेंट काढून ते बँकेला देता येईल.

ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर अनेकदा तारांबळ उडते. पण तारांबळ होऊ न देता किमान 24 तास वाट पाहणं गरजेचं असतं. 24 तासांनंतरही पैसे न मिळाल्यास बँकेला लेखी तक्रार देण्याचाही मार्ग आहे. तक्रार केल्यानंतरही एका आठवड्याच्या आत तुमचे पैसे येत नसतील तर दररोज 100 रुपये या प्रमाणे तुम्हाला दंड स्वरुपात बँकेकडून पैसे मिळतील.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?