AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाने खा आणि प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका, भरत गोगावले यांच्या गटारीच्या अनोख्या शुभेच्छा

राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी गटारी अमावस्येनिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आनंदाने खा आणि प्या... पण जास्त गटार-बिटारात लोळू नका," असा गमतीशीर सल्ला त्यांनी दिला. उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, तत्पूर्वी गटारीचा आनंद घेणाऱ्यांना त्यांच्या खास शैलीतील या शुभेच्छा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आनंदाने खा आणि प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका, भरत गोगावले यांच्या गटारीच्या अनोख्या शुभेच्छा
bharat gogawaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 12:10 PM
Share

आनंदाने खा आणि प्या… पण जास्त गटार-बिटारात लोळू नका, अशा अनोख्या आणि हटक्या शुभेच्छा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या आहेत. उद्या 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने तत्त्पूर्वीच गटारीनिमित्त मेजवानी करणाऱ्यांना मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. गोगावले यांनी या अनोख्या आणि हटके शुभेच्छा दिल्याने त्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरू आहे.

12 तारखेला गटारी साजरी करताना नागरिकांनी आनंदाने खा आणि प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका,” असा गमतीशीर सल्ला भरत गोगावले यांनी दिला आहे. श्रावण महिना आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव लक्षात घेता पुढील एक महिना 15 दिवस पोटाला थोडा संयम आणि विश्रांती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अलिबाग येथील कार्यक्रमात बोलताना दिलेला हा अनोखा सल्ला आणि त्यांचा वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेहमी आपल्या गावरान आणि रोखठोक विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या भरत गोगावलेंच्या या वक्तव्याची नागरिकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

पावणे दोन वर्षानंतर तिढा सुटला

दरम्यान, गोगावले यांनी काल मीडियाशी संवाद साधताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाष्य केलं आहे. पावणे दोन वर्षापासून हा तिढा होता तो आज सुटलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि उद्या याचे डिक्लेरेशन होईल, असे आम्हाला वाटते, असं गोगावले म्हणाले.

आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आमदार आहेत, खासदार आहेत. दोन मंत्री आहेत. आम्ही सगळे मिळून काम करू. जिल्ह्याचा विकास करू. ठीक आहे प्रत्येकाला असं वाटतं. परंतु परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यांच्या अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर आम्ही बिनविरोध पाठवलं. त्यानंतर आम्ही बसून हे सगळं ठरवलं आणि त्यांनी ते मान्य केलं, असंही त्यांनी सांगितलं.

आज गटारी, उद्यापासून श्रावण

दरम्यान, आज गटारी अमावस्या आहे. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून अनेक जण मांसाहार टाळतात. मद्यपान करणंही टाळतात. मात्र, आदल्या दिवशी असणाऱ्या गटारी अमावस्येचा भरपूर आनंद लुटत असतात. आजही तळीराम गटारी अमावस्येचा भरपूर आनंद लुटताना दिसत आहेत. अनेकांनी तर आधीच प्लान केल्या प्रमाणे पिकनिक स्पॉटही गाठून आनंदाला वाट मोकळी करून दिली आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?