भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट बातमी! आशियाई विकास बँकेने आर्थिक विकासाचा अंदाज 10 टक्क्यांपर्यंत आणला खाली

| Updated on: Jul 20, 2021 | 10:51 PM

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन किंवा कर्फ्यूसारखी कठोर पावले उचलली होती. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे बरेच नुकसान झाले. जून 2021 मध्ये लॉकडाऊन उघडल्यापासून व्यवसायिक कार्यात तेजी आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट बातमी! आशियाई विकास बँकेने आर्थिक विकासाचा अंदाज 10 टक्क्यांपर्यंत आणला खाली
India's GDP
Follow us on

नवी दिल्ली : आशियाई विकास बँकेने (ADB) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज 10 टक्क्यांपर्यंत खाली आणला. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मोठ्या नुकसाना यास कारणीभूत ठरवलेय. एडीबीने 2021 च्या सुरुवातीला 11 टक्के वाढीचा अंदाज लावला होता. तसेच एडीबीने म्हटले आहे की, 2020-21 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपीची वाढ 1.6 टक्के होती. यामुळे पूर्ण आर्थिक वर्षाच्या आर्थिक वाढीतील मंदी आधीच्या 8 टक्क्यांवरून 7.3 टक्क्यांवर आली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन किंवा कर्फ्यूसारखी कठोर पावले उचलली होती. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे बरेच नुकसान झाले. जून 2021 मध्ये लॉकडाऊन उघडल्यापासून व्यवसायिक कार्यात तेजी आहे.

जर लसीकरणाची गती वाढली तर आर्थिक गाडी पुन्हा रुळावर

दक्षिण आशियाविषयी एडीबीने म्हटले आहे की, मार्च ते जून 2021 दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आर्थिक परिस्थितीला मोठा धक्का बसला. व्यवसाय आणि ग्राहक हे एक वर्षापूर्वीचे व्यवहार करण्यापेक्षा अधिक चांगले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्राच्या आर्थिक विकासाचा अंदाज 9.5 टक्क्यांवरून 8.9 टक्क्यांवर आला. चालू आर्थिक वर्षात तो 6.6 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढला. या भागात लसीकरणाची गती वाढल्यामुळे आर्थिक वाढीमध्ये वेगवान पुनर्प्राप्ती होऊ शकते. त्याचा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे, परंतु अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत खूपच कमी आहे.

‘आरबीआयचा वाढीचा अंदाज कमी करण्याचे कारण नाही’

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चालू आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये 10.5 टक्के वाढीचा अंदाज लावलाय. एप्रिलमध्ये झालेल्या पॉलिसीच्या घोषणेदरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने हा अंदाज लावला होता. मागील महिन्यात केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच म्हटले आहे की, आरबीआयने वाढीचा अंदाज कमी करण्याचे कोणतेही कारण नाही. आरबीआयमार्फत समर्थन देण्यासाठी जी-एसएपी 2.0 अंतर्गत दुसर्‍या तिमाहीत 1.2 लाख कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीज खुल्या बाजारातून खरेदी केल्याचे दास यांनी गेल्या महिन्यात जाहीर केले होते.

संबंधित बातम्या

7th Pay Commission News: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांची प्रतीक्षा संपली, सप्टेंबरपासून येणार वाढीव पगार

1 वर्षात ‘या’ योजनेत पैसे होतात दुप्पट; 500 रुपयांच्या SIP द्वारे करा गुंतवणूक

Bad news for the Indian economy! The Asian Development Bank lowered its economic growth forecast to 10 percent