DA मध्ये पुन्हा वाढ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांपर्यंत फायदा; जाणून घ्या

Central Government employees : वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या ज्ञापनात असे म्हटले आहे की, ही वाढ 15 जुलै 2021 पासून प्रभावी मानली जाईल. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, ज्यांना पगार दिला जातो, तो मूळ वेतनाच्या 189 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आलाय.

DA मध्ये पुन्हा वाढ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांपर्यंत फायदा; जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 10:33 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) काही सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा दिवाळीची भेट (Diwali Gift) दिलीय. खरं तर केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोगाच्या (6th pay commission) शिफारशींनुसार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या (5th pay commission) शिफारशींनुसार महागाई भत्ता (DA Hike) वाढवण्यात आलाय.

कोणाचा महागाई भत्ता किती वाढला?

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Govt Employees) महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. त्याचवेळी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय स्वायत्त संस्था (CAB Employees) पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

वाढ केव्हा लागू होणार

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या ज्ञापनात असे म्हटले आहे की, ही वाढ 15 जुलै 2021 पासून प्रभावी मानली जाईल. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, ज्यांना पगार दिला जातो, तो मूळ वेतनाच्या 189 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आलाय. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पगारदार कर्मचाऱ्यांचा डीए 356 टक्क्यांवरून आता 368 टक्के करण्यात आलाय. केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आल्याचाही केंद्राच्या मेमोरँडममध्ये उल्लेख आहे.

तीन हप्त्यांमध्ये वाढीव भत्ता जोडला

विशेष म्हणजे मार्च 2020 मध्ये कोरोना आला, तेव्हा सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत गोठविली होती, जी 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पर्यंत ही थकवण्यात आली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत 17 टक्के डीए आणि डीआर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ राज्यमंत्री म्हणाले होते. 1 जुलै 2021 पासून तीन हप्त्यांमध्ये वाढीव भत्ता जोडून हा लाभ देण्यात आला. हेच कारण आहे की, आता महागाई भत्ता आणि मदत एकत्रितपणे 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के झाली. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून 3 टक्के, 1 जुलै 2020 पासून 4 टक्के आणि 1 जानेवारी 2021 पासून 4 टक्के दरवाढ समाविष्ट आहे. अशा प्रकारे एकूण वाढ 11 टक्के वाढ करण्यात आली होती.

एचआरए देखील 27% वाढवला

महागाई भत्त्यासंदर्भातील वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारनेही घरभाडे भत्ता (HRA) मध्ये 27 टक्के वाढ केली. वस्तुतः खर्च विभागाने 7 जुलै 2017 ला एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के ओलांडेल, तेव्हा घरभाडे भत्ता सुधारित केला जाणार आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला, त्यामुळे घरभाडे भत्ताही सुधारित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

युनियन बँक ऑफ इंडियाचा नफा तिप्पट वाढला, उत्पन्नातही फायदा

बँक ऑफ इंडियाचा धमाका, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 100% वाढ, NPA घटला

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.