AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांचा विश्वास कमी होतोय, माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं विधान

RBI ने चालू आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांवर आणला, तर IMF ने 2021 मध्ये 9.5 टक्के आणि पुढील वर्षी 8.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला. राजन म्हणाले की, आर्थिक कार्यक्रमांचा भर चांगल्या नोकऱ्या निर्माण करण्यावर असायला हवा, तर राज्ये स्थानिक लोकांसाठी नोकऱ्या राखून ठेवत आहेत.

भारतीयांचा विश्वास कमी होतोय, माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं विधान
raghuram rajan
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 3:18 PM
Share

नवी दिल्लीः अलिकडच्या वर्षांत देशाच्या आर्थिक भविष्यावरील भारतीयांचा विश्वास कमी झालाय, असं विधान भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलंय. ते म्हणाले की, कोविड 19 साथीच्या आजाराने भावनांवर अधिक खोलवर परिणाम केलाय आणि मध्यमवर्गीय लोक गरिबीत गेलेत.

देशांतर्गत शेअर बाजार वेगाने वाढतोय

व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना राजन म्हणाले की, देशांतर्गत शेअर बाजार वेगाने वाढतोय, परंतु हे वास्तव दर्शवत नाही की अनेक भारतीय गंभीर संकटात आहेत. “अलिकडच्या वर्षांत आमचा आत्मविश्वास थोडा कमी झाला. आर्थिक भविष्यातील आमचा आत्मविश्वास कमी झाला. साथीच्या रोगांच्या आकडेवारीमुळे आमचा आत्मविश्वास आणखी कमी झाला, तर अनेक मध्यमवर्गीय गरिबीच्या खाईत गेलेत.”

RBI ने विकासदराचा अंदाज कमी केला

RBI ने चालू आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांवर आणला, तर IMF ने 2021 मध्ये 9.5 टक्के आणि पुढील वर्षी 8.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला. राजन म्हणाले की, आर्थिक कार्यक्रमांचा भर चांगल्या नोकऱ्या निर्माण करण्यावर असायला हवा, तर राज्ये स्थानिक लोकांसाठी नोकऱ्या राखून ठेवत आहेत.

आर्थिक कामगिरी घसरल्याने लोकशाहीची विश्वासार्हताही धोक्यात

“आमची आर्थिक कामगिरी जसजशी घसरत आहे, तसतशी आमची लोकशाही क्रेडेन्शियल्स, आमची युक्तिवाद करण्याची तयारी, आदर आणि मतभेद सहन करण्याच्या आमच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे.,” विशेष म्हणजे या गरजेवरही भर देण्यात आला. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये सध्या प्रोफेसर असलेले राजन म्हणाले की, सर्वांना सोबत न घेणारी वाढ ही शाश्वत नसते.

लोकशाही मूल्ये जपण्यावर भर

राजन यांनी आपल्या भाषणात लोकशाही मूल्ये जपण्यावर विशेष भर दिला. ते म्हणाले की, देशातील जनतेच्या मूलभूत अधिकारांचे कोणत्याही किमतीत संरक्षण केले पाहिजे. जेव्हा आपण वादविवाद आणि टीका दडपतो, तेव्हा एक वाईट धोरण असते आणि त्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी असते.

संबंधित बातम्या

यंदाच्या दिवाळीत ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मुलीचे भविष्य करा सुरक्षित, उत्तम परताव्याची खात्री

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरावीत का, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Economic Recovery Indians faith is waning says former governor Raghuram Rajan

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.