Palm Oil Export Ban : आजपासून इंडोनेशियाकडून होणारी पाम तेलाची निर्यात बंद, भारतावर काय परिणाम होणार?

देशात वाढत असलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशियाने (Indonesia) 28 एप्रिल म्हणजे आजपासून पाम ऑईल (Palm Oil) ची निर्यात बंद केली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.

Palm Oil Export Ban : आजपासून इंडोनेशियाकडून होणारी पाम तेलाची निर्यात बंद, भारतावर काय परिणाम होणार?
खाद्यतेल
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 7:23 AM

Indonesia Palm Oil Export Ban: देशात वाढत असलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशियाने (Indonesia) 28 एप्रिल म्हणजे आजपासून पाम ऑईल (Palm Oil) ची निर्यात बंद केली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत गरजेच्या जवळपास 50 ते 60 टक्के पाम तेल इंडोनेशियामधून आयात करतो. अशा परिस्थितीमध्ये इंडोनेशियाकडून येणारी तेलाची आवक पूर्णपणे ठप्प झाल्याने येणाऱ्या काळात भारताला तेलाचा तुटवडा जाणू शकतो. तेलाचे दर आधीच गगनाला भिडले आहे, ते आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात आणखी भर म्हणजे सध्या रशिया (Russia) आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. आपण युक्रेनकडून गरजेच्या सुमारे सत्तर टक्के सुर्यफूलाचे तेल आयात करतो. मात्र युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनकडून येणाऱ्या तेलाचा पुरवठा देखील प्रभावित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पाम तेल निर्यात बंदीची घोषाणा केली होती, त्यानुसार आजपासून निर्यात बंद करण्यात आली आहे.

भारतावर काय परिणाम होणार?

भारत दरवर्षी इंडोनेशिया आणि मलेशियाकडून आठ मिलियन टनापेक्षा अधिक पाम तेलाची आयात करतो. आजपासून इंडोनेशियाने निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचा पुरवठा प्रभावित होणार आहे. भारत इंडोनेशियाकडून गरजेच्या सत्तर टक्के तर मलेशियाकडून तीस टक्के पाम तेलाची आयात करतो. अशा परिस्थितीमध्ये जर इंडोनेशियाकडून येणारा पाम तेलाचा पुरवठा बंद झाल्यास भारतामध्ये तेलाचे दर आणखी वाढू शकतात. आधीच सुर्यफूल आणि सोयाबिन तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. पाम तेलाचा उपयोग केवळ खाण्यासाठीच नाही तर त्याचा उपयोग साबन, शाम्पू यासारख्या सौंदर्यप्रसाधनामध्ये देखील केला जातो. त्यामुळे आता शांपू, साबत यासारख्या वस्तूंचे भाव देखील वाढू शकतात.

आयातीसाठी दुसऱ्या देशांचा पर्याय

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आधीच सुर्यफुलाचे तेल महाग झाले आहे. देशात सुर्यफुलाच्या तेलाचा तुटवडा आहे. त्यात आता इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात बंद केली आहे. त्यांमुळे देशात तेलाचा तुटवाडा निर्माण होऊन महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला आता तेल आयातीसाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. दुसऱ्या देशातून तेल आयात करून गरज पूर्ण करावी लागणार आहे, तर तेलाचे दर नियंत्रणात राहू शकतील.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.