AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू नभातले तारे माळलेस ना तेव्हा… पहिल्या प्रेमाबद्दल रतन टाटा झाले हळवे

Ratan Tata | . प्रत्येकाच्या मनातील हळव्या कोपऱ्यात कोणीतरी असतेच. एकतरी आवडती व्यक्ती तिथे असतेच. उद्योगपती रतन टाटा यांची प्रेम कहाणी कधीच पुढे गेली नाही. चार वेळा त्यांच्या प्रेमाची रेल्वे काही पुढे सरकलीच नाही. या उमद्या मनाच्या, मृदू स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातही प्रेमाची पहाट उगवली. पण हे प्रेम त्याच्या शेवटाला कधीच पोहचू शकले नाही.

तू नभातले तारे माळलेस ना तेव्हा... पहिल्या प्रेमाबद्दल रतन टाटा झाले हळवे
| Updated on: Dec 28, 2023 | 2:12 PM
Share

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्याविषयी प्रत्येकाला आदर आहे. ते तर अनेकांचे रिअल हिरो आहेत. रतन टाटा हे त्यांच्या अनेक कामांमुले सतत चर्चेत असतात. त्यांचे फॅन फॉलोवर्स खूप आहेत. त्यांची यशोगाथा आपण वाचली आहे. पण एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रेमाविषयी मन मोकळे केले. Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनाचा हळवा कोपरा मोकळा केला. ‘अशी कोणी पुन्हा भेटलीच नाही, जिला पत्नी म्हणू शकू’ अशा शब्दात त्यांनी मनातील एका कोपऱ्यातील दडवून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. रतन टाटा यांनी त्यांच्या 4 प्रेम कथाविषयी सांगितले आहे. पण पहिल्यांदाच त्यांनी लग्नाविषयी काहीतरी सांगितले.

युद्धाने केला प्रेमाचा अंत

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेम प्रकरणावरील पडदा हटवला. रतन टाटा हे एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. 1962 मधील भारत-चीन युद्धामुळे या प्रेमकहाणीला ब्रेक लागला. या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. पण नंतर त्यांना भारतात परतावे लागले. काही कारणास्तव त्यांची मैत्रिण काही भारतात येऊ शकली नाही. पुढे युद्धाची माशी शिंकली आणि लग्नाला परवानगी मिळाली नाही. हे प्रेम प्रकरण तिथेच संपले. रतन टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

लग्न न झाल्याची रुखरुख?

अमेरिकेतील प्रेमकथा संपल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अजून कोणीतरी आले. पण त्यांना पत्नी म्हणू शकू, असा काही हा मामला नव्हता, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. त्यानंतर आयुष्यात व्यवसायानिमित्त अनेक चढउतार आले. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक शहरात प्रवास सुरु झाला. त्यामुळे लग्न अथवा इतर गोष्टीत कधी मन रुळले नाही. आज इतक्या वर्षानंतर त्याविषयी विचार केला तर एक सेकंद पण आपल्याला दुःख होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तू नभातले तारे माळलेस ना, तेव्हा

रतन टाटा यांच्या आई-वडिलांचा संसार चांगला सुरु होता. पण काहीतरी खटपट झाल्याचे निमित्त आणि दोघांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. ते लॉस एंजेलिस येथे शिक्षणाला पोहचले. तो काळ भारलेला होता. निसर्ग संगतीला होता. उराशी अनंत ध्येय होती आणि एक चेहरा मनात होता, असा तो काळ होता. त्याचवेळी ही नजरेची चुकामूक झाली होती. गोष्ट लग्नापर्यंत येऊन ठेपली होती. पण ते प्रेमप्रकरण तिथेच थांबले.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.