AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani : 26/11 च्या मुंबई हल्ल्यात अडकले होते गौतम अदानी, थोडक्यात वाचला होता जीव, कशी झाली होती सूटका

Gautam Adani : मुंबई हल्ल्यात गौतम अदानी बालं बाल बचावले होते.

Gautam Adani : 26/11 च्या मुंबई हल्ल्यात अडकले होते गौतम अदानी, थोडक्यात वाचला होता जीव, कशी झाली होती सूटका
| Updated on: Jan 08, 2023 | 6:49 PM
Share

नवी दिल्ली : भारताचे टॉप अरबपती उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या जीवावरचे संकट कसे टळले याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित आठवण सांगितली. नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात (26/11 Mumbai attacks) ते हॉटेल ताजमध्ये अडकले होते. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबसह (Ajmal Kasab) त्याच्या साथीदाराने 26 नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता. त्यात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागला होता. मुंबई पोलिसांच्या जिगरबाज अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या हल्ल्यात वीर मरण आले होते. पण जीवाची बाजी लावून अधिकाऱ्यांनी, कमांडोंनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यात क्रुरकर्मा अजमल कसाब याला पकडण्यता आले होते.

गौतम अदानी यांनी इंडिया टीव्हीला याविषयीची मुलाखत दिली. त्यात त्यांनी दिवशीचा घटनाक्रम सांगितला. त्यानुसार, हॉटेल ताजमध्ये ते दुबईतील मित्रासोबत व्यवसायासंबंधीच्या एका बैठकीत होते. त्याचवेळी त्यांना कळले की हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे.

लष्कर-ए-तोयबाने (lashkar-e-taiba) मुंबईतील काही ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यात हॉटेल ताजचाही समावेश होता. अदानी यांनी सांगितले की, त्यांनी या हॉटेलमध्ये दहशतवाद्यालाही पाहिले होते. हा हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागेल. अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली.

दुबईहून मुंबईत आलेल्या मित्रासोबत अदानी यांनी एक बैठक संपवली. ते हॉटेलमधून बाहेर पडणार तेव्हा मित्रांनी दुसऱ्या बैठकीसाठी आग्रह धरला. त्यामुळे अदानी हे पुन्हा रेस्टॉरंटमध्ये थांबले. त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर त्यांना दहशतवादी हल्ल्याची वार्ता कळली.

त्यानंतर त्यांनी कॉपी बोलवली आणि बैठकीला सुरुवात झाली. थोड्याच वेळात हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही मिनिटांतच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मागच्या दरवाजाने किचनमध्ये नेले. त्यानंतर त्यांना बाहेर नेण्यात आले.

26 नोव्हेबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा इतिहासातील सर्वात भयानक हल्ला होता. पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.