AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचा 8000 कोटींचा खेळ, कोका-पेप्सीला बसणार धक्का

कोका-कोला आणि पेप्सीला भारतातून आव्हान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कॅम्पा कोलाकडून हे आव्हन मिळणार आहे. रिलायन्स कंज्झूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सॉफ्ट ड्रिंक उद्योगात 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुकेश अंबानी यांचा 8000 कोटींचा खेळ, कोका-पेप्सीला बसणार धक्का
Mukesh Ambani
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 19, 2025 | 9:50 AM
Share

Campa Cola 2.0: कोका-कोला आणि पेप्सी या आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांसाठी भारतात धोक्याची घंटा वाजली आहे. भारतामधील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडून या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. मुकेश अंबानी यांनी कोका-कोला आणि पेप्सीच्या विरोधात भारतात कॅम्पा कोला रिलॉन्च केले. त्यामुळे कोका-कोला आणि पेप्सीच्या मार्केटला मोठा धक्का बसला आहे. आता मुकेश अंबानी कोला आणि पेप्सीला झटका देण्यासाठी 8000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. थोडक्यात, अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने भारतातील 60,000 कोटी रुपयांच्या सॉफ्ट ड्रिंक मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अंबानी यांचा 8000 कोटींचा प्लॅन काय?

कोका-कोला आणि पेप्सीला भारतातून आव्हान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कॅम्पा कोलाकडून हे आव्हन मिळणार आहे. रिलायन्स कंज्झूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सॉफ्ट ड्रिंक उद्योगात 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 12 ते 15 महिन्यात कॅम्पा ब्रँडसाठी 6,000 ते 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कंपनीचा हा सर्वात मोठा कॅपेक्स (capital expenditure) प्लॅन आहे. त्याचा सर्वात मोठा फटका कोका-कोला आणि पेप्सीला बसणार आहे.

प्राइस वॉरचा झटका

RCPL ने आपल्या सॉफ्ट ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक, हायड्रेशन आणि ज्यूससारख्या उत्पादनाच्या किंमती कोका-कोला, पेप्सीको, टाटा कंझ्युमर आणि डाबरसारख्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या तुलनेत 20-40% कमी ठेवल्या आहेत. थिंक टॅक आयसीआरआयईआरनुसार, भारताचा सॉफ्ट ड्रिंक्स उद्योग ₹67,000 कोटी रुपयांचा आहे. तसेच 2030 पर्यंत 1.47 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कंझ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनेही उडी घेतली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) मध्ये रियायन्स कंझ्यूमरने 11,500 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. देशातील 10 लाखांपेक्षा जास्त दुकानदारांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहचले आहे.

कोका-कोला आणि पेप्सीला झटका?

भारताचे सॉफ्ट ड्रिंक बाजार जवळपास 60,000 कोटी रुपयांचा आहे. त्यावर कोका-कोला आणि पेप्सी वर्चस्व होते. परंतु रिलायन्ससारखे सुपर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि कमी किंमती यामुळे या प्रॉडक्टला फटका बसू लागला आहे. रिलायन्सची ग्रोथ वेगाने होत आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचा कॅम्पा कोला लवकरच भारतीय सॉफ्ट ड्रिंक बाजारावर वर्चस्व मिळवण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा