AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचा 8000 कोटींचा खेळ, कोका-पेप्सीला बसणार धक्का

कोका-कोला आणि पेप्सीला भारतातून आव्हान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कॅम्पा कोलाकडून हे आव्हन मिळणार आहे. रिलायन्स कंज्झूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सॉफ्ट ड्रिंक उद्योगात 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुकेश अंबानी यांचा 8000 कोटींचा खेळ, कोका-पेप्सीला बसणार धक्का
Mukesh Ambani
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 19, 2025 | 9:50 AM
Share

Campa Cola 2.0: कोका-कोला आणि पेप्सी या आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांसाठी भारतात धोक्याची घंटा वाजली आहे. भारतामधील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडून या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. मुकेश अंबानी यांनी कोका-कोला आणि पेप्सीच्या विरोधात भारतात कॅम्पा कोला रिलॉन्च केले. त्यामुळे कोका-कोला आणि पेप्सीच्या मार्केटला मोठा धक्का बसला आहे. आता मुकेश अंबानी कोला आणि पेप्सीला झटका देण्यासाठी 8000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. थोडक्यात, अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने भारतातील 60,000 कोटी रुपयांच्या सॉफ्ट ड्रिंक मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अंबानी यांचा 8000 कोटींचा प्लॅन काय?

कोका-कोला आणि पेप्सीला भारतातून आव्हान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कॅम्पा कोलाकडून हे आव्हन मिळणार आहे. रिलायन्स कंज्झूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सॉफ्ट ड्रिंक उद्योगात 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 12 ते 15 महिन्यात कॅम्पा ब्रँडसाठी 6,000 ते 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कंपनीचा हा सर्वात मोठा कॅपेक्स (capital expenditure) प्लॅन आहे. त्याचा सर्वात मोठा फटका कोका-कोला आणि पेप्सीला बसणार आहे.

प्राइस वॉरचा झटका

RCPL ने आपल्या सॉफ्ट ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक, हायड्रेशन आणि ज्यूससारख्या उत्पादनाच्या किंमती कोका-कोला, पेप्सीको, टाटा कंझ्युमर आणि डाबरसारख्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या तुलनेत 20-40% कमी ठेवल्या आहेत. थिंक टॅक आयसीआरआयईआरनुसार, भारताचा सॉफ्ट ड्रिंक्स उद्योग ₹67,000 कोटी रुपयांचा आहे. तसेच 2030 पर्यंत 1.47 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कंझ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनेही उडी घेतली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) मध्ये रियायन्स कंझ्यूमरने 11,500 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. देशातील 10 लाखांपेक्षा जास्त दुकानदारांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहचले आहे.

कोका-कोला आणि पेप्सीला झटका?

भारताचे सॉफ्ट ड्रिंक बाजार जवळपास 60,000 कोटी रुपयांचा आहे. त्यावर कोका-कोला आणि पेप्सी वर्चस्व होते. परंतु रिलायन्ससारखे सुपर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि कमी किंमती यामुळे या प्रॉडक्टला फटका बसू लागला आहे. रिलायन्सची ग्रोथ वेगाने होत आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचा कॅम्पा कोला लवकरच भारतीय सॉफ्ट ड्रिंक बाजारावर वर्चस्व मिळवण्याची शक्यता आहे.

Follow Us
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल