AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्त मोबाइल कॉलिंगनंतर स्वस्त इंधन…मुकेश अंबानी यांनी या कंपन्यांसोबत मिळून बनवला मेगा प्लॅन

Reliance mukesh ambani: हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या कारमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्याला खर्च पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत कमी येतो. तसेच कार चालवताना धूराऐवजी त्या ठिकाणी पाणी निघते. या इंधनामुळे कारचा प्रती किलोमीटर 6 ते 10 रुपये असणार खर्च कमी होऊन 4 रुपये प्रती क‍िलोमीटरवर येणार आहे.

स्वस्त मोबाइल कॉलिंगनंतर स्वस्त इंधन...मुकेश अंबानी यांनी या कंपन्यांसोबत मिळून बनवला मेगा प्लॅन
mukesh ambani
| Updated on: Apr 11, 2024 | 2:28 PM
Share

रिलायन्स भारतात स्वस्त मोबाईल कॉलींग आणले. त्यानंतर मोबाईल सर्वसामान्यांपर्यंत गेला. मोबाईल सुरुवातीला आले तेव्हा इनकमिंग कॉलसुद्धा पैसे लागत होते. परंतु आता अनलिमिटेड कॉलिंग सुरु झाले आहे. यामुळे रस्त्या रस्त्यावर दिसणारे एसटीडी बुथ बंद झाले. सर्वांच्या हातात मोबाईल आले. मोबाईलच्या या क्रांतीनंतर इंधन क्षेत्रात बदल करण्याचे काम रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सुरु केले आहे. या बदलामुळे सहा ते दहा रुपये किलोमीटर असलेला कारचा इंधन खर्च चार रुपयांवर येणार आहे.

एक लाख कोटींची गुंतवणूक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काही महिन्यांपूर्वी हायड्रेजन इंधनावर चालणारी कार घेऊन संसदेत पोहचले होते. त्या गोष्टीची चर्चा खूप झाली. हायड्रोजन फ्यूल आता भविष्यातील इंधन म्हणून पाहिले जात आहे. यामुळे पर्यावरणाचा फायदा होणार आहे. तसेच इंधन खर्च वाचणार आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज जगभरातील कंपन्यांसोबत मिळून फ्यूल इंडिया विकसित करत आहेत. यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे इकोनॉमिक टाईम्समधील बातमीत म्हटले आहे. ग्रीन हाइड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचा प्लँट गुजरामधील कच्‍छ येथील दीनदयाल पोर्ट अथॉरिटी (DPA) (कांडला पोर्ट) वर लावला गेला आहे.

या कंपन्यांसोबत करार

र‍िलायंस इंडस्‍ट्रीजकडून लार्सन अँड टूब्रो (L&T), ग्रीनको ग्रुप आणि वेल्सपून न्यू एनर्जीसोबत मिळून नवीन प्लँटवर काम केले जात आहे. त्यात आगामी काळात एक लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. ऑक्टोंबर 2023 मध्ये पोर्ट अथॉर‍िटीकडे या कंपन्यांनी 300 प्रती प्लॉटचे 14 भूखंड घेण्यासंदर्भात बोलणी सुरु केली होती. त्यांना मागील महिन्यात 14 प्‍लॉट दिले असून त्याचे क्षेत्र 4000 पेक्षा जास्त आहे. एक प्‍लॉटमधून वर्षाला 1 मिलियन टन (MTPA) ग्रीन अमोनिया उत्पादन करण्याचे लक्ष्‍य ठेवले आहे.

कारचा खर्च होणार कमी

हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या कारमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्याला खर्च पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत कमी येतो. तसेच कार चालवताना धूराऐवजी त्या ठिकाणी पाणी निघते. या इंधनामुळे कारचा प्रती किलोमीटर 6 ते 10 रुपये असणार खर्च कमी होऊन 4 रुपये प्रती क‍िलोमीटरवर येणार आहे.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.