AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल अंबानी यांच्या हातातून तीन कंपन्या जाणार, कर्जात बुडालेल्या या कंपन्यांना घेण्यासाठी कोण आले पुढे

Anil Ambani Reliance Capital: रिलायन्स कॅपिटलमधील असलेल्या तीन विमा कंपन्या हिंदुजा ग्रुप खरेदी करणार आहे. हिंदूजा ग्रुपची कंपनी असलेली इंडसइन्ड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) या कंपन्या घेणार आहे.

अनिल अंबानी यांच्या हातातून तीन कंपन्या जाणार, कर्जात बुडालेल्या या कंपन्यांना घेण्यासाठी कोण आले पुढे
anil ambani
| Updated on: May 03, 2024 | 2:38 PM
Share

देशात सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासमोर असणाऱ्या अडचणी कमी होत नाही. अनिल अंबानी यांच्याकडे असणाऱ्या कंपन्यांवर संकटांचे ढग कायम आहे. आता कर्जात बुडालेल्या तीन कंपन्या अनिल अंबानी यांच्या हातातून जाणार आहे. रिलायन्स कॅपिटलमधील असलेल्या तीन विमा कंपन्या हिंदुजा ग्रुप खरेदी करणार आहे. हिंदूजा ग्रुपची कंपनी असलेली इंडसइन्ड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) या कंपन्या घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंश्योरेन्स रेगुलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (IRDAI) लवकरच या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळणार आहे. मागील आठवड्यात कमिटी ऑफ क्रेडिटर्सने IIHL ला 27 मे पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले आहे, असे वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिले आहे.

आतापर्यंत अशी झाली प्रक्रिया

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLT) रिलायन्स कॅपिटलला IIHL साठी ₹9,650 कोटींच्या योजनेस 27 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली होती. NCLT ने IIHL ला 90 दिवसांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. IRDAI ने मार्चमध्ये लिहिलेल्या पत्रात या डीलबद्दल काही आक्षेप नोंदवले होते. नियामकाने विशेषतः IIHL च्या शेअरहोल्डिंग स्ट्रक्चरवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच IRDAI ने IIHL च्या भागधारकांची तपशीलवार माहिती मागवली होती. एका सूत्राने सांगितले की, IIHL ने IRDAI च्या सर्व प्रश्नांचे निराकरण केले आहे आणि नियामक लवकरच त्यास मान्यता देईल अशी अपेक्षा आहे.

रिलायन्सवर किती आहे कर्ज

29 नोव्हेंबर 2021 रोजी, RBI ने पेमेंट डिफॉल्ट आणि गव्हर्नन्स लॅप्समुळे रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड विसर्जित केले होते. सप्टेंबर 2021 मध्ये, रिलायन्स कॅपिटलने भागधारकांना सांगितले की कंपनीवर 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. रिलायन्स कॅपिटलचा कारभार IIHL कडे 17 मे पर्यंत ट्रॉन्सफर केला नाही पुन्हा परवानगीची प्रक्रिया करावी लागणार आहे.

डीलनुसार, रिलायन्स कॅपिटलची रिलायन्स जनरल आणि रियायन्स हेल्थ इन्शूरन्समध्ये शंभर टक्के भागेदारी आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफमध्ये 51% भागेदारी आहे. हिंदुजा ग्रुपने जे स्ट्रक्चर जाहीर केले आहे, त्यानुसार 30% एक्विजिशन कॉस्ट अशिया एंटरप्राइजेज इक्विटी गुंतवणुकीत घेणार आहे. तर 70% डेटच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. आयआयएचएलने एक ड्राफ्ट स्ट्रक्चर तयार केली आहे. त्यानुसार रिलायन्स कॅपिटलची संपूर्ण इक्विटी खरेदी केली जाणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.