AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Press | केजरीवाल- सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्ला, म्हणाले, मोदी आणि शहा यांनी...

Sanjay Raut Press | केजरीवाल- सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्ला, म्हणाले, मोदी आणि शहा यांनी…

| Updated on: Feb 28, 2026 | 1:05 PM
Share

दिल्लीच्या मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 23 आरोपींसह राउस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. दोन्ही नेत्यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीच्या मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 23 आरोपींसह राउस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. दोन्ही नेत्यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात सीबीआयने आरोप दाखल करून केजरीवाल आणि इतरांना अटक केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालिन नायब राज्यपाल यांच्याकडून या प्रकरणावर मोठा दबाव होता. केजरीवाल नेहमीच सांगत होते की मद्य धोरणात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की ह्या केसमध्ये पुरावे नसतानाही अटक करण्यात आली. त्यांनी या सीबीआय अधिकाऱ्यांवर कारवाई, निलंबन आणि खटले चालवण्याची मागणी केली. राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केजरीवाल यांची माफी मागावी, अशीही मागणी केली.

Published on: Feb 28, 2026 01:03 PM
Follow Us