AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSU Disinvestment : विक्री होणार ही सरकारी कंपनी , या 4 कंपन्या रेसमध्ये, जाणून घ्या तुमचा फायदा

PSU Disinvestment : मोदी सरकारने आणखी एका कंपनीच्या विक्रीची कवायत सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकर निर्गुतंवणुकीचे लक्ष घेऊन त्यादृष्टीने पाऊल टाकत आहे.

PSU Disinvestment : विक्री होणार ही सरकारी कंपनी , या 4 कंपन्या रेसमध्ये, जाणून घ्या तुमचा फायदा
अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक
| Updated on: Apr 16, 2023 | 10:11 AM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) आणखी एका सरकारी कंपनी विक्रीची तयारी पूर्ण केली आहे. निर्गुंतवणुकीचे (Disinvestment) लक्ष्य गाठण्यासाठी केंद्राने कवायत सुरु केली आहे. केंद्र सरकारला या प्रक्रियेतून जवळपास 6,000 कोटी रुपये कमाईची आशा आहे. या लिलावानंतर या कंपनीवर खासगी कंपनीचे वर्चस्व होईल. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी, वाटा विक्री करण्याची तयारी करत आहे. पण केंद्र सरकारला या प्रक्रियेत कटू अनुभव आले आहे. या कंपन्यांना अपेक्षित आर्थिक बोली मिळत नसल्याचे दिसून येते. आता ही सरकारी कंपनी खरेदीसाठी 4 मोठ्या कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. तुमच्याकडे जर या कंपन्यांचे शेअर असतील. तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

ही आहे कंपनी केंद्र सरकार पुढील महिन्यात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील (SCI) त्यांचा हिस्सा विक्रीची तयारी करत आहे. त्यासाठी आर्थिक बोली लावण्यात येणार आहे. कंपनीची इक्विटी खरेदीसाठी अनेक कंपन्या मैदानात आल्या आहेत. ही डील, हा करार त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 4 मोठ्या कंपन्यांनी निर्गुतंवणुकीच्या या योजनेत रस दाखवला आहे.

4 कंपन्या लावतील बोली शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदीसाठी वेदांता रिसोर्सेस, सेफ सी सर्व्हिसेस, जेएम बॅक्सी आणि मेघा इंजिनिअरिंग यांनी पुढाकार घेतला आहे. पण या कंपन्यांनी अधिकृतपणे काहीच माहिती दिली नाही. तर केंद्र सरकारतर्फे अर्थमंत्रालयाने पण काहीच खुलासा केला नाही.

मोठा फायदा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील निर्गुंतवणुकीची प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळे नॉन-कोअर ॲसेट बाजूला ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करण्यात येणार आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे दक्षिण मुंबईतील शिपिंग हाऊस, पवई येथील एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि इतर अनेक मालमत्ता आहे.

सरकार नाही करणार विक्री कंपनीच्या निर्गुंतवणुकीचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे. पण कंपनीच्या मालमत्तेची विक्री केंद्र करणार नाही. त्यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड ॲंड ॲसेट्स लिमिटेड या कंपनीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अगोदर केंद्र सरकार शिपिंग व्यवसाय विक्री करेल आणि नंतर या कंपनीच्या मालमत्तांच्या विक्रीवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येईल.

केंद्र सरकार 63.75 टक्के वाटा विकणार केंद्र सरकार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील 63.75 टक्के हिस्सेदारी विक्री करणार आहे. त्यानंतर व्यवस्थापकीय धोरण खासगी कंपनीच्या हाती जाईल. कंपनीतील उर्वरीत शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात येईल.

Follow Us
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं