नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Election) पडघम वाजू लागले आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत भावनिक मुद्यांसोबतच विकासाचा आणि रोजगाराचाही (Employment) मुद्या गाजणार आहे. त्यासाठी आता एक एक योजना तयार होत आहे. मोदी सरकारने (Modi Government) आणखी एक मोठी योजना तयार केली आहे. त्यात 20 लाख लोकांना रोजगार मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. या राज्यातील लोकांना त्याचा फायदा होईल. येथील तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.