AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्ती योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य, एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ

निवृत्ती योजनेबाबत (Retirement Schemes) नागरिकांची जागृतता दिवसेंदिवस वाढत आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) नुसार नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि अटल पेन्शन (Atal Pension) योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वार्षिक आधारावर 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवृत्ती योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य, एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 10:00 AM
Share

निवृत्ती योजनेबाबत (Retirement Schemes) नागरिकांची जागृतता दिवसेंदिवस वाढत आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) नुसार नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि अटल पेन्शन (Atal Pension) योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वार्षिक आधारावर 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोनही पेन्शन योजनेचा एकूण असेट 7.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी या योजनेतील एकूण गुंतवणूक 5.59 लाख कोटी रुपये इतकी होती. एनपीएस लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये चालू आर्थिक वर्षात 22.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 29 टक्क्यांनी वाढली आहे. दोनही योजना मिळून पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सरासरी 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. निवृत्तीनंतरचा एक सुरक्षीत आधार आणि पैसे बचतीचा एक चांगला मार्ग म्हणून अनेक जण सध्या या योजनांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे पहायला मिळत आहे.

लाभाची वयोमर्यादा

अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्षांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. कमी वयात या योजनेंतर्गत बचतीला सुरुवात केल्यास एक चांगला परतावा तसेच पेन्शन तुम्हाला मिळू शकते. तुमचे वय जसजसे वाढत जाईल तसतसे तुम्हाला अधिक पैसे भरावे लागतात. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येत नाही.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम ही एक चांगली योजना आहे. निवृत्तीनंतरचा आधार म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. अनेकांचा पगार कमी असतो. कमी पगारात वृद्धापकाळासाठी बचत करून ठेवणे शक्य नसते. यासाठीच या दोन योजनांची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच खासगी क्षेत्रात काम करणारा कोणताही कर्मचारी या योजनांचा लाभ घेऊ शकतो.

संबंधित बातम्या

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.