AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI | महागाई सणाचाही आनंद हिरवणार..भारतीयांचा येणारा काळ कठीण..

RBI | महागाई सणाचाही आनंद हिरवणार असल्याचे चित्र आहे. एका सर्वेक्षणात रिझर्व्ह बँकेच्या एका पावलामुळे भारतीयांचा खिसा खाली होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

RBI | महागाई सणाचाही आनंद हिरवणार..भारतीयांचा येणारा काळ कठीण..
आता बसणार फटकाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 23, 2022 | 6:07 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी बातमी नक्कीच चांगली नाही. जगातील मोठी वृत्तसंस्था रॉयटरने (Reuters) भारतात सर्वेक्षण केले असता, त्यात भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांच्या (Reserve Bank of India)धोरणामुळे पुन्हा महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

RBI पुढील आठवड्यात व्याजदर वाढवण्याची (Interest Rate Hike) शक्यता आहे. रॉयटर्सच्या पोलमध्ये अर्थशास्त्रज्ञांनी रेपो रेट (Repo Rate Hike) मध्ये 0.50 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज वर्तवला आहे. तर काही अर्थतज्ज्ञांच्या मते, आरबीआय रेपो दरात 35 आधार अंकाची वाढ करेल.

अंदाज वर्तवण्यात येत आहे की, आरबीआय, 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत व्याजदर वाढीची घोषणा करेल. महागाई आटोक्यात आणण्यासाठी बँकेला रेपो दरात वाढीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

या वर्षात आरबीआयने व्याजदरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये मध्यवर्ती बँकेने 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे यावेळीही व्याजदर वाढीची आशंका आहे. महागाईचा दर 7 टक्के आहे. तो केंद्रीय बँकेच्या निर्धारीत दरापेक्षा अधिक आहे.

या सर्वेक्षणातील अर्धांहून अधिक तज्ज्ञांनी आरबीआय रेपो दरात 50 ​​आधार अंकांची वृद्धी करेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणातील बाबी लक्षात घेता, सर्वांचा जोर हा व्याजदर वाढीवर असल्याचे समोर आले. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनेही व्याजदर वाढवले आहेत. त्याचा परिणामही दिसून येत आहे.

आरबीआयने व्याजदर वाढवल्यास महागाईने सर्वसामान्यांची कंबर तुटल्याशिवाय राहणार नाही. आरबीआयच्या या धोरणामुळे बँकाही व्याजदर वाढवतील. गृह, वाहन आणि इतर कर्जावरील व्याजदर वाढेल. जास्त ईएमआयचा बोजा लोकांच्या खिशावर पडेल. बचत सोडा, खर्चाची जुळवाजुळव करताना त्यांची बिकट परिस्थिती होईल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.