AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Currency Note : मोठी बातमी! नोटा गेल्या कुणा गावा, 88 हजार कोटी नोटा गायब, RTI मध्ये मोठा खुलासा

Currency Note : मोदी सरकारच्या दोन कार्यकाळात पहिल्यांदा नोटबंदी झाली आणि आता 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट माघारी बोलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नोटांचे पुराण अजूनही थांबले नाही. 88 हजार कोटींच्या या नोटाच चलनातून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..

Currency Note : मोठी बातमी! नोटा गेल्या कुणा गावा, 88 हजार कोटी नोटा गायब, RTI मध्ये मोठा खुलासा
| Updated on: Jun 17, 2023 | 6:19 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) दोन कार्यकाळात पहिल्यांदा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली होती. काळापैसा बाहेर काढण्यासाठी आणि दहशतवादाला होणारे फंडिंग रोखण्यासाठी नोटबंदीची सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. या 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट माघारी बोलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ती सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पण भारतीय नोटांचे पुराण अजूनही थांबले नाही. 88 हजार कोटींच्या या नोटाच चलनातून गायब (Mysterious Disappear) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहे.

या नोटा झाल्या गायब भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) 1999-2010 या काळात लॉकर्समध्ये जमा करण्यात आलेल्या 339.95 दशलक्ष अतिरिक्त नोटांची अडचण होती. कारण या रक्कमेच्या आकड्यांचा सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसच्या आकड्यांशी ताळमेळ बसत नव्हता. पण आता तर मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. टाकसाळीत नवीन डिझाईनच्या 500 रुपयांच्या नोटा तयार करण्यात आला होता. 8,810.65 दशलक्ष नोटा तयार करण्यात आल्या होत्या. आरबीआयला यातील केवळ 7,260 दशलक्ष नोटा मिळाल्या आहेत. म्हणजे या नोटा चलनात आहेत. तर 88,032.5 कोटी नोटा गायब आहेत.

नोटा गेल्या कुणा गावा द फ्री प्रेस जर्नलमधील एका रिपोर्टनुसार, या नोटा कुठे गायब झाल्या याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. 1,760.65 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा गायब आहेत. एप्रिल 2015 ते मार्च 2016 पर्यंतच्या नाशिक प्रिटिंग प्रेसमध्ये मुद्रित 210 दशलक्ष नोटांचा यामध्ये समावेश आहे. गायब झालेल्या नोटांचे मुल्य 88,032.5 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवक्त्याने याप्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

येथे होते नोटांची छपाई

  1. भारतात तीन ठिकाणी नोटांची छपाई करण्यात येते
  2. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (पी) लिमिटेड, बेंगळुरु
  3. करन्सी नोट प्रेस, नाशिक
  4. बँक नोट प्रेस, देवास

RTI मधून खुलासा आरटीआयमधून हा खळबळजनक खुलासा झाला. मनोरंजन रॉय यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती मागितली होती. नाशिक करन्सी नोट प्रेसद्वारा 375.450 दशलक्ष 500 रुपयांच्या नवीन नोटांचे मुद्रण करण्यात आले होते. परंतु, रिझर्व्ह बँकेकडील नोंदीनुसार, केवळ 345.000 कोटी नोटा मिळाल्या आहेत. या नोटा एप्रिल 2015 ते डिसेबर 2016 पर्यंत मुद्रित करण्यात आल्या होत्या.

RBI म्हणते 500 च्या नोटा नाही मिळाल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (पी) लिमिटेड, बंगळुरुने 2016-2017 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेला 5,195.65 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा केला होता. बँक नोट प्रेस देवासने 1,953 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. भारतीय रिझर्व्ह बँकेला या प्रेसमधून केवळ नवीन डिझाईनच्या 7,260 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. या तीनही प्रेसने एकूण 8,810.65 दशलक्ष नवीन डिझाईनच्या 500 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. पण आरबीआयच्या मते, त्यांना केवळ नवीन डिझाईनच्या 7,260 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या.

केंद्रीय यंत्रणा करणार तपास हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. 1,760.65 दशलक्ष नोटा गायब होणे ही काही साधी गोष्ट नाही. सक्तवसूली संचालनालय आणि केंद्रीय आर्थिक गुप्तचर ब्युरोकडे याविषयीची रितसर तक्रार करण्यात आली. आता या दोन्ही यंत्रणा याप्रकरणात तपास करण्याची शक्यता आहे.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.