AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिक परतावा, किंमत 40 रुपयांपेक्षा कमी

कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर या फार्मा कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आणि फक्त 6 महिन्यांत स्टॉक 200 टक्क्यांहून अधिक वाढला. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 11.95 रुपयांवरून 38.75 रुपये झाला.

'या' फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिक परतावा, किंमत 40 रुपयांपेक्षा कमी
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 10:49 AM
Share

नवी दिल्लीः देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी पातळीवर व्यवहार करीत आहे. बाजारातील तेजीदरम्यान अनेक मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभाग मल्टिबॅगर बनलेत. यापैकी एक म्हणजे राज मेडिसेफ इंडियाचा शेअर आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर या फार्मा कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आणि फक्त 6 महिन्यांत स्टॉक 200 टक्क्यांहून अधिक वाढला. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 11.95 रुपयांवरून 38.75 रुपये झाला. राज मेडिसेफ इंडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आणि त्यांची गुंतवणूक 6 महिन्यांत 1 लाख रुपयांनी वाढून 3.20 लाख रुपये झाली.

एक महिन्यात आपल्या भागधारकांना 30 टक्के परतावा

सोमवारी बाजारात कमकुवतपणा असूनही राज मेडिसेफ इंडियाच्या शेअरने उडी घेतली. बीएसईवर राज मेडिसेफ इंडिया लिमिटेडचा शेअर्स 4.87 टक्क्यांनी वाढून 38.75 रुपये झाला. स्मॉलकॅप फार्मा स्टॉक गेल्या आठवड्यात 7.5 टक्क्यांनी घसरला होता, गेल्या एक महिन्याच्या व्यापार सत्रात 41.85 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर गेल्या आठवड्यात 7.5 टक्क्यांच्या जवळपास घसरला. फार्मा स्टॉकने गेल्या एक महिन्यात आपल्या भागधारकांना 30 टक्के परतावा दिला. गेल्या एका महिन्यात हा फार्मा स्टॉक 28.45 रुपये प्रति शेअरवरून 38.75 च्या पातळीवर गेला. या वर्षी आतापर्यंत त्यात 270 टक्के वाढ झाली, तर गेल्या एका वर्षात स्टॉक 224 टक्क्यांनी वाढला.

फेब्रुवारी 2021 मध्ये किंमत 10 रुपयांच्या खाली होती

फेब्रुवारी 2021 पर्यंत हा फार्मा स्टॉक प्रति शेअर 10 रुपयांच्या खाली व्यापार करत होता. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर शेअर्स गगनाला भिडलाय.

1 लाखाचे 6 महिन्यांत 1.20 लाख केले

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी फार्मा कंपनी राज मेडिसेफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्याचे 1 लाखाचे वाढून 1.30 लाख झाले असते. दुसरीकडे जर 1 जानेवारी 2021 रोजी कोणी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 3.70 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी राज मेडिसेफ इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 1 लाख रुपये वाढून 3.24 लाख रुपये झाले असते. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समधून त्यांची गुंतवणूक काढून घेतली नाही.

संबंधित बातम्या

नोकरी शोधणाऱ्यांसाठी अलर्ट, EPFO ​चा हा सल्ला पाळल्यास पैसे राहणार सुरक्षित

ड्रोन उद्योगाला PLI योजनेतून संजीवनी मिळणार, 5000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित

Shares of Yaa Pharma return more than 200 per cent in 6 months, priced below Rs 40

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.