AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Project : राजकारण तापले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरु, पण प्रकल्प हातचा गेल्याने राज्याला बसला इतक्या कोटींचा फटका..

Project : वेदांतानंतर नागपूरचा टाटा-एअरबस प्रकल्प हाताबाहेर गेल्याने राज्याचे इतक्या कोटींचे नुकसान झाले..

Project : राजकारण तापले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरु, पण प्रकल्प हातचा गेल्याने राज्याला बसला इतक्या कोटींचा फटका..
इतक्या कोटींचे नुकसानImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 28, 2022 | 9:11 PM
Share

नवी दिल्ली : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गेला. आता नागपूरमधील टाटा-एअरबस प्रकल्पही (Tata Airbus Project) निसटला. यावरुन राज्यातील राजकारण (Politics) तापले आहे. आरोपांच्या जोरदार फैरी सुरु आहे. आरोप होत राहतील, राजकारणही होत राहील, पण राज्याचे यामुळे किती नुकसान झाले त्यावरही एक नजर टाकुयात..

टाटा-एअरबस प्रकल्प राज्याबाहेर, गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प तब्बल 22,000 कोटी रुपयांचा होता. हा सध्या राज्य सरकारला दुसरा मोठा झटका मानण्यात येत आहे. यापूर्वी 1.5 लाख कोटी रुपयांचा वेदांत-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमधील बडोद्यात या प्रकल्पाची कोनशिला ठेवणार आहेत, पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे ही उपस्थित राहणार आहेत.

या प्रकल्पातंर्गत सी-295 हे वाहतूक विमान तयार करण्यात येईल. त्यासाठी भारतीय वायुसेनेने 2021 मध्ये 21,935 कोटी रुपयांचा करार केला होता. टाटा कंपनी त्यासाठी बडोद्यात प्रकल्प उभारत आहे.

या प्रकल्पातून 56, सी-295 विमान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीने एअरबस या युरोपियन कंपनीसोबत करार केला आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका असून त्या तोंडावर हे दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये होत आहेत.

याप्रकल्पातून भारतीय बनावटीचे वाहतूक विमान सप्टेंबर 2026 मध्ये मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. सी-295एमडब्ल्यू या विमानाची 5-10 टन क्षमता आहे. हे विमान जवळपास 70 सैनिकांना घेऊन जाऊ शकते.

टाटा-एअरबस प्रकल्प नागपूर येथे होणार होता. त्यासाठी जमीनही मागण्यात आली होती. पण हा प्रकल्प गुजरातकडे गेला. त्यामुळे हजारो रोजगार महाराष्ट्राच्या हातून गेले एवढं मात्र नक्की.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.