AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adani Aurangabad : गौतम अदानी यांचे औरंगाबाद कनेक्शन काय? कोणती केली नवीन कंपनी स्थापन, काय करेल काम

Adani Aurangabad : गौतम अदानी आणि त्यांचा समूह गेल्या महिन्याभरापासून मीडियात चर्चेत आहे. आता या समूहाने एक नवीन कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे काम काय आहे, तिचे औरंगाबाद कनेक्शन काय आहे, ते पाहुयात.

Adani Aurangabad :  गौतम अदानी यांचे औरंगाबाद कनेक्शन काय? कोणती केली नवीन कंपनी स्थापन, काय करेल काम
| Updated on: Mar 17, 2023 | 6:36 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून गौतम अदानी (Gautam Adani) आणि त्यांचा अदानी समूह (Adani Group) मीडियात सातत्याने चर्चेत आहे. या समूहाच्या उदयापासून ते पडझडीच्या अनेक बातम्या तुम्ही या दीड महिन्यात वाचल्या असतील. तर त्यापूर्वी अदानी कसे झपाट्याने जगातील श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले, त्यांनी दुसऱ्या क्रमांकापर्यंत कशी झेप घेतली हे कौडकौतूकही तुम्ही वाचले असेल. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाची पडझड आणि झपझप कोसळलेल्या त्यांच्या शेअर्सची माहिती ही तुम्ही वाचली असेल. त्यानंतर आता काही स्टॉकला अप्पर सर्किट लागल्याची बातमी येऊन धडकली आहे. या सर्व घडामोडीत गौतम अदानी यांनी एक नवीन कंपनी (New Company) स्थापन केली आहे. या कंपनीचे काम काय? ती कशासाठी स्थापन केली, तिचे औरंगाबाद कनेक्शन (Aurangabad Connection) काय? हे पाहुयात..

अदानी ट्रान्समिशन ही अदानी समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीने ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. म्हणजे अदानी ट्रान्समिशनची उपकंपनी अस्तित्वात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) असे या कंपनीचे नाव आहे. अदानी ट्रान्समिशनने या घडामोडींविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, अदानी ट्रान्समिशनने संपूर्ण स्वतंत्र असलेली आणि सहाय असलेली कंपनी स्थापन केली आहे. 15 मार्च 2023 रोजी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अर्थात कंपनीने अद्याप व्यावसायिक सुरुवात केलेली नाही.

काय आहे प्लॅन

अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अदानी ट्रान्समिशनने ही कंपनी स्थापन केली आहे. औरंगाबादमध्ये समांतर वितरण परवाना लागू करण्यासाठी या कंपनीची मदत होणार आहे. अजून या कंपनीचे एकूण कार्य आणि तिचा उद्देश स्पष्ट करण्यात आला नाही. तसेच या कंपनीचे काम कसे चालेल, याची माहिती देण्यात आलेली नाही. या कंपनीचे कार्यालय कुठे आहे. तिचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शेअर्सची अवस्था काय

  1. अदानी समूहाच्या शेअर बाजारात 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत. त्यातील सहा कंपन्यानी आज लाभासह व्यापार बंद केला. तर चार कंपन्यांना स्टॉक मार्केटमध्ये नुकसान सहन करावे लागले. बीएसईवर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर पाच टक्क्यांनी वधरला. आज त्याची किंमत 777.95 रुपये आहे. या कंपनीचे बाजार मूल्यांकन 5860.92 कोटी रुपयांहून 1.23 लाख कोटी रुपये झाले. या शेअरने अप्पर सर्किट लावले होते.
  2. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 4.84 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आज 976.05 टक्क्यांवर बंद झाला. या कंपनीचे बाजार मूल्यांकन 5,025.29 कोटी रुपयांहून 1.08 लाख कोटी रुपये झाले आहे. या कंपनीच्या अंतर्गतच अदानी समूहाने नवीन कंपनी स्थापन केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे
  3. अंबुज सिमेंट्स 3.74 टक्क्यांनी वाढला. हा शेअर आता 378.60 रुपयांवर बंद झाला. तर एसीसी चा शेअर 0.73 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 1753.15 रुपयांवर आज बंद झाला. अदानी पोर्टस आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा शेअर आज स्थिर होता. तो 679.15 रुपयांवर बंद झाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.