
अटल पेन्शन योजना (APY) 2015 मध्ये सुरू करण्यात आली. खाजगी असंघटित किंवा छोट्या व्यवसायात काम करणारी अशी लोकं ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही अशांसाठी सरकार अटल योजना स्किम आणली आहे. या लोकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळविण्यासाठी व्यक्तींना त्यांच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये दरमहा पगारातून लहान रक्कम गुंतवावी लागते. ही योजना बरीच फायदेशीर असली तरी ती प्रत्येकासाठी योग्य नाही.
या योजनेसाठी सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने हे निकष पूर्ण केले नाहीत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर अटल पेन्शन योजनेच्या लाभांसाठी कोण पात्र नाही आणि त्यामागील कारणे काय आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
1. निर्धारित वयोमर्यादे बाहेरचे लोकं – अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी एक विशिष्ट वयोमर्यादा आहे. जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. सरकारचा असा विश्वास आहे की या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणून, ही योजना फक्त 18 ते 40 वयोगटातील नियमित योगदान देऊ शकणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही निर्धारित वयोमर्यादेबाहेर असाल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
2. इनकम टॅक्स भरणारे – जर तुम्हाला टॅक्स भरावा लागत असेल, म्हणजेच तुम्ही कर भरता असाल तर तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी पात्र राहणार नाही. कारण सरकारने ही योजना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुरू केली आहे. जे व्यक्ती सामान्यतः कर भरत नाहीत आणि त्यांना भविष्यातील पेन्शन लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. मात्र करदात्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
3. बँक खाते नसलेली लोकं – अटल पेन्शन योजना (APY) ही पूर्णपणे बँक-लिंक्ड योजना आहे. जर तुमचे बँक खाते नसेल किंवा तुमचे खाते आधारशी जोडलेले नसेल, तर तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकत नाही. कारण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी व्यक्तीच्या मासिक पगारातून बँक खात्यातून थेट पैसे कापले जाते आणि तुमचे पेन्शन त्याच खात्यात जमा केले जाते. म्हणून, बँक खाते असणे अनिवार्य आहे.
4. भारतीय नागरिक नसलेले – अटल पेन्शन योजना (APY) फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. परदेशी नागरिक या योजनेचे फायदे घेऊ शकत नाहीत.
या योजनेसाठी पात्र असलेल्यांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर निश्चित मासिक पेन्शन मिळते. पाच पेन्शन पर्याय आहेत: दरमहा 1 हजार रूपये दरमहा 2 हजार रूपये, दरमहा 3 हजार रूपये, दरमहा 4 हजार रूपये आणि दरमहा 5 हजार रूपये इतकं आहे. तुम्ही तुमच्या गरजा आणि क्षमतांनुसार कोणताही पेन्शन प्लॅन निवडू शकता.
या योजनेतील गुंतवणूक रक्कम तुमच्या वयावर आणि निवडलेल्या पेन्शनवर अवलंबून असते. जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी सामील झाली आणि तिला 5 हजार रुपये पेन्शन हवे असेल तर तिला दरमहा अंदाजे 210 रुपये गुंतवावे लागतील. दरम्यान जर एखादी व्यक्ती 30 व्या ही योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरूवात केली असेल तर तिला 5 हजार रुपये पेन्शनसाठी दरमहा अंदाजे 577 रुपये जमा करावे लागतील. जितक्या लवकर तुम्ही योजनेचा लाभ घ्याल तितकी कमी गुंतवणूक करावी लागेल.