AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची 35 लाख कोटींचा कर वसुलीची तयारी, अधिकारी आयकर दात्याला धमकवणार नाही, प्रेमाने करणार हे काम

Vivad Se Vishwas direct tax Scheme: सरकारने 2020 मध्ये 'विवाद से विश्वास' योजनेचा पहिला टप्पा आणला होता.त्यावेळी सुमारे एक लाख करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. सरकारला सुमारे 75,000 कोटी रुपयांचा कर त्या माध्यमातून प्राप्त झाला होता. त्याच्या यशामुळे ही योजना पुन्हा आणली आहे.

सरकारची 35 लाख कोटींचा कर वसुलीची तयारी, अधिकारी आयकर दात्याला धमकवणार नाही, प्रेमाने करणार हे काम
Vivad Se Vishwas direct tax Scheme
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 20, 2024 | 2:56 PM
Share
Vivad Se Vishwas direct tax Scheme: केंद्र सरकार आयकर दात्यांकडून 35 लाख कोटींचा कर वसुलीची तयारी करत आहे. परंतु त्यासाठी सरकारने एक विशेष योजना आणली आहे. या योजनेस सुरुवात 1 ऑक्टोबरपासून होत आहे. त्याचे परिपत्रक शुक्रवारी काढण्यात आले. कर विवादसंदर्भात असलेल्या या योजनेला ‘विवाद से विश्वास 2.0’ असे नाव देण्यात आहे. प्रलंबित आयकर वादांचे निराकरण करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा जुलैमध्ये सादर केलेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

अर्थसंकल्पात केली होती घोषणा

अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, “केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख ‘विवाद से विश्वास 2.0’ योजनेसाठी निश्चित केली आहे. सुमारे 35 लाख कोटी रुपयांच्या 2.7 कोटी थेट कर मागण्यांवर विविध कोर्टात वाद सुरू आहेत. त्यामुळे तो वाद सोडवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, सरकार कर सुलभ करण्यासाठी, करदात्या सेवा सुधारण्यासाठी, कर निश्चितता प्रदान करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासोबत खटले कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवणार आहे.

यापूर्वी आणली होती योजना

सरकारने 2020 मध्ये ‘विवाद से विश्वास’ योजनेचा पहिला टप्पा आणला होता.त्यावेळी सुमारे एक लाख करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. सरकारला सुमारे 75,000 कोटी रुपयांचा कर त्या माध्यमातून प्राप्त झाला होता. त्याच्या यशामुळे ही योजना पुन्हा आणली आहे.

50 लाख रुपयांपेक्षा मोठी प्रकरणे हवी

कर विवादांशी संबंधित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ‘विवाद से विश्वास’ योजना-2 आणली आहे. सरकारने आयकरांच्या प्रकरणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ही योजना आणील आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातील भाषणानुसार, मूल्यांकन वर्ष संपल्यानंतर, 3 वर्षांपासून ते 5 वर्षांपर्यंतची आयकर संबंधित प्रकरणे पुन्हा उघडली जाऊ शकतात. मात्र हे प्रकरणे 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असावी, अशी अट आहे.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.