AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Currency : 100 रुपयांपेक्षा अधिकच्या भारतीय नोटा नकोच, या देशाचा अजब फतवा

Indian Currency : अर्थव्यवस्था वाढीसाठी या देशाला भारताची गरज आहे. पण त्यांना भारतीय चलनाविषयी कसला आकस आहे, असा नियम त्यांनी समोर केला आहे. 100 रुपयांपेक्षा अधिकच्या भारतीय नोटा नकोच, असा फतवाच या देशाच्या राष्ट्रीय बँकेने काढला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातीलच नाही तर सर्वच नागरिकांची गोची झाली आहे.

Indian Currency : 100 रुपयांपेक्षा अधिकच्या भारतीय नोटा नकोच, या देशाचा अजब फतवा
| Updated on: Sep 28, 2023 | 2:07 PM
Share

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : चीनच्या धूर्त चालीमुळे जगात भारताविषयी कलुषीत वातावरणाचा पहिला ट्रेलर कॅनडाच्या (India-Canada Tension) रुपाने समोर आला. भारताने कॅनडाच्या नांग्या ठेचल्याने जगभरात जबरदस्त संदेश गेला. पण भारताच्या शेजारील काही देश अजूनही चीनच्या ओंजळीने पाणी पितात, हे उघड झाले आहे. श्रीलंकेने त्यात स्वतःचे दिवाळे काढून घेतले. पाकिस्तान त्याच मार्गाने जात आहे. आता आणखी एका शेजाऱ्याने भारताविषयीची आकस बुद्धी समोर आणली आहे. या देशाने भारतीयांचे त्यांच्या देशात स्वागत असल्याचे म्हणत, हळूच एक नियम समोर केला आहे. 100 रुपयांपेक्षा अधिकच्या भारतीय नोटा आणू नका, असा फतवाच या देशाच्या राष्ट्रीय बँकेने काढला आहे.

नेपाळ राष्ट्र बँकेचा फतवा

नेपाळ हा सामाजिक, धार्मिकदृष्ट्या भारताचा अत्यंत शेजारील देश आहे. पण तोही चीनकडे झुकलेला आहे. तुम्ही धार्मिक यात्रेवर अथवा पर्यटनासाठी नेपाळमध्ये जात असाल तर आता तुम्हाला भारतीय नोटा नेताना काळजी घ्यावी लागणार आहे. 100 रुपयांपेक्षा अधिक भारतीय नोटा आणूच नका, असा फतवा नेपाळ राष्ट्र बँकेने काढला आहे. त्यासाठीची अधिसूचना त्यांनी काढली आहे. 100 रुपयांपेक्षा अधिक भारतीय नोटांना नेपाळने प्रतिबंध घातला आहे. विशेष म्हणजे 5000 रुपयांपेक्षा या नोटा अधिक नको. म्हणजे नेपाळमध्ये जाताना तुम्हाला चिल्लरच घेऊन जावी लागणार आहे. ती पण 5000 रुपयांच्या आतमध्येच. 100 रुपये मूल्यांपेक्षा कमी असलेल्या भारतीय नोटाच तिथे वैध ठरविण्यात आल्या आहेत.

नेपाळी नागरिकांसाठी वेगळा नियम

नेपाळ राष्ट्र बँकेने याविषयीची अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीयांना नेपाळमध्ये केवळ पाच हजार रुपयेच नेता येतील. याविषयीची माहिती सीमा शुल्क विभागाला देण्यात आली आहे. पण नेपाळी नागरिकांसाठी या नियमात सवलत देण्यात आली आहे. नेपाळी नागरिक भारतात 25 हजार रुपये रोख नेऊ शकतो. अत्यावश्यक सेवेसाठी ही मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे. तर चलन बदलासाठी ही मर्यादा 25 हजार रुपये करण्यात आली आहे.

कारण काय

असाच प्रश्न भारतीय आणि नेपाळी नागरिक केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बँकेला विचारत आहे. पण त्यांना अद्यापही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. नेपाळच्या प्रमुखांनी आताच चीनचा दौरा केलेला आहे. चीनशी सलोख्याचे संबंध ठेवताना भारताविषयी नेपाळचे धोरण आकस बुद्धीचे असल्याचे समोर येत आहे.

काय होईल परिणाम

या धोरणामुळे भारत आणि नेपाळ सीमेवरील खुल्या बाजाराला, व्यापाराला आणि दोन्ही देशांच्या पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. धार्मिक पर्यटनही मोठ्या प्रमाणात होते, त्यावर पण परिणाम होऊ शकतो. याविषयी भारत सरकारने योग्य पावलं उचलण्याची विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Follow Us
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर