AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?

या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?
| Updated on: Dec 28, 2023 | 12:50 PM
Share

कोरोनाचा काळ सरला आणि देशातील कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन आणि मनी 9 च्या पल्स पर्सनल फायनान्स सर्व्हेमधून समोर आले आहे. गेल्या वर्षभरामध्ये देशात कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही संख्या 2022 मध्ये 11 % इतकी होती.

अधिक कर्ज कोणी घेतले ? : 

या 11 % मधील 8 % लोकांनी गृहकर्ज , 4 % लोकांनी वाहन कर्ज आणि 2 % लोकांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. यामध्ये तमिळनाडू , कर्नाटक,मध्यप्रदेश, ओडिसा आणि राजस्थानमध्ये वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. तसेच महाराष्ट्र,चंदीगड, हरियाणा , पंजाब आणि दिलीमध्ये वाहन कर्ज सर्वाधिक घेण्यात आली आहे.

किती कर्ज घेतले जाऊ शकते ? : 

तसेच आता सुमारे 21 % भारतीय कुटुंबं पुढील वर्षभरात कर्ज घेऊ शकतात असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये 10 % भारतीय कुटुंबं गृहकर्ज घेण्याच्या विचारात असून यामध्ये दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड,जम्मू-काश्मीर आणि हिमाचल या राज्यांचा समावेश आहे. तसेच येत्या वर्षात 5 % लोक हे वाहन कर्ज घेण्याच्या विचारात असून महाराष्ट्र, दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत वैयक्तिक कर्जामध्ये सुमारे 30 % वाढ झाली आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जांमध्ये अधिक वाढ दिसून आली आहे.

सर्वेक्षण कुठे करण्यात आले ? : 

ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशातील 20 राज्यांमध्ये 115 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये केले असून देशातील 1140 गावे , शहरी वाड्यांचा समावेश केला होतं.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.