AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?

या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?
shamal sawant
shamal sawant | Updated on: Dec 28, 2023 | 12:50 PM
Share

कोरोनाचा काळ सरला आणि देशातील कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन आणि मनी 9 च्या पल्स पर्सनल फायनान्स सर्व्हेमधून समोर आले आहे. गेल्या वर्षभरामध्ये देशात कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही संख्या 2022 मध्ये 11 % इतकी होती.

अधिक कर्ज कोणी घेतले ? : 

या 11 % मधील 8 % लोकांनी गृहकर्ज , 4 % लोकांनी वाहन कर्ज आणि 2 % लोकांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. यामध्ये तमिळनाडू , कर्नाटक,मध्यप्रदेश, ओडिसा आणि राजस्थानमध्ये वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. तसेच महाराष्ट्र,चंदीगड, हरियाणा , पंजाब आणि दिलीमध्ये वाहन कर्ज सर्वाधिक घेण्यात आली आहे.

किती कर्ज घेतले जाऊ शकते ? : 

तसेच आता सुमारे 21 % भारतीय कुटुंबं पुढील वर्षभरात कर्ज घेऊ शकतात असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये 10 % भारतीय कुटुंबं गृहकर्ज घेण्याच्या विचारात असून यामध्ये दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड,जम्मू-काश्मीर आणि हिमाचल या राज्यांचा समावेश आहे. तसेच येत्या वर्षात 5 % लोक हे वाहन कर्ज घेण्याच्या विचारात असून महाराष्ट्र, दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत वैयक्तिक कर्जामध्ये सुमारे 30 % वाढ झाली आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जांमध्ये अधिक वाढ दिसून आली आहे.

सर्वेक्षण कुठे करण्यात आले ? : 

ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशातील 20 राज्यांमध्ये 115 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये केले असून देशातील 1140 गावे , शहरी वाड्यांचा समावेश केला होतं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच