AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?

या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?
shamal sawant
shamal sawant | Updated on: Dec 28, 2023 | 12:50 PM
Share

कोरोनाचा काळ सरला आणि देशातील कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन आणि मनी 9 च्या पल्स पर्सनल फायनान्स सर्व्हेमधून समोर आले आहे. गेल्या वर्षभरामध्ये देशात कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही संख्या 2022 मध्ये 11 % इतकी होती.

अधिक कर्ज कोणी घेतले ? : 

या 11 % मधील 8 % लोकांनी गृहकर्ज , 4 % लोकांनी वाहन कर्ज आणि 2 % लोकांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. यामध्ये तमिळनाडू , कर्नाटक,मध्यप्रदेश, ओडिसा आणि राजस्थानमध्ये वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. तसेच महाराष्ट्र,चंदीगड, हरियाणा , पंजाब आणि दिलीमध्ये वाहन कर्ज सर्वाधिक घेण्यात आली आहे.

किती कर्ज घेतले जाऊ शकते ? : 

तसेच आता सुमारे 21 % भारतीय कुटुंबं पुढील वर्षभरात कर्ज घेऊ शकतात असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये 10 % भारतीय कुटुंबं गृहकर्ज घेण्याच्या विचारात असून यामध्ये दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड,जम्मू-काश्मीर आणि हिमाचल या राज्यांचा समावेश आहे. तसेच येत्या वर्षात 5 % लोक हे वाहन कर्ज घेण्याच्या विचारात असून महाराष्ट्र, दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत वैयक्तिक कर्जामध्ये सुमारे 30 % वाढ झाली आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जांमध्ये अधिक वाढ दिसून आली आहे.

सर्वेक्षण कुठे करण्यात आले ? : 

ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशातील 20 राज्यांमध्ये 115 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये केले असून देशातील 1140 गावे , शहरी वाड्यांचा समावेश केला होतं.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल