MPSC Students: निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा! रिक्त पदांच्या विषयावर चर्चा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी (MPSC) समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय.

MPSC Students: निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा! रिक्त पदांच्या विषयावर चर्चा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
MPSC StudentImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 3:30 PM

काल दहीहंडी उत्सव (Dahihandi Festival) ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत नेहमीप्रमाणेच हा उत्साह शिगेला पोहचलेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. या उत्सवात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली जी घोषणा चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील गोविंदांना (Govinda Maharashtra) सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळेल अशी ती घोषणा होती. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय तर अनेकांनी त्याचा कडाडून विरोध केलाय ज्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी (MPSC) समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय.

अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदा पथकांतील गोविंदाना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नाराज झालेत. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्यासोबतच सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी दिला. आधीच अनेक पदे रिक्त असताना त्यावर चर्चा करायची सोडून सरकारची जुमलेबाजी करत असल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गोविंदाना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोकप्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल, असेही ते म्हणाले. हे सर्वसामान्याचे सरकार आहे. करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे उत्सव काळजी घेऊन साजरे करा. गणेशोत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण आहे.” असेही त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.