
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने ग्रुप डी (लेव्हल १) मधील रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या महाभरतीद्वारे तब्बल २१ हजार ९९७ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची एक संधी मिळणार आहे. या मेगाभरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान खालील तारखा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. तसेच ज्यांनी NCVT कडून ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र’ (NAC) किंवा ITI पूर्ण केले आहे, ते देखील या पदांसाठी पात्र आहेत. यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे असणे गरजेचे असणार आहे. सरकारी नियमांनुसार, ओबीसी (OBC) उमेदवारांना ३ वर्षे, तर एससी/एसटी (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षांची सवलत मिळेल.
रेल्वेने या भरतीसाठी पारदर्शक फी पद्धत ठेवली आहे, ज्यामध्ये परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना ठराविक रक्कम परत मिळणार आहे. जर तुम्ही खुला आणि ओबीसी प्रवर्गात असाल तर तुम्हाला ५०० रुपये फी भरावी लागेल. परीक्षा दिल्यानंतर ४०० रुपये परत मिळतील. तर SC/ST/महिला/दिव्यांग/माजी सैनिक यांना २५० रुपये फी भरायची असून परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण २५० रुपये परत मिळतील. फी परत मिळवण्यासाठी उमेदवारांनी अर्जात स्वतःचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड अचूक भरणे अनिवार्य आहे.
ही भरती प्रक्रिया एकूण चार टप्प्यांत पूर्ण होईल
इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाईट्सवर (उदा. RRB Mumbai, RRB Pune) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना नवीन पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी आणि १० वीचे मार्कशीट स्कॅन करून तयार ठेवावे.