AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI recruitment 2021| शिक्षणाची अट 10 वी पास, 26 हजार रुपयांपर्यंत पगार, आरबीआयमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडेंट (Office Attendant Recruitment 2021) या पदासाठी भरती सुरु आहे.

RBI recruitment 2021| शिक्षणाची अट 10 वी पास, 26 हजार रुपयांपर्यंत पगार, आरबीआयमध्ये 'या' पदावर भरती सुरु
आरबीआय
| Updated on: Mar 08, 2021 | 1:57 PM
Share

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडेंट (Office Attendant Recruitment 2021) या पदासाठी भरती सुरु आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडेटच्या 841 पदांसांठी भरती करण्यात येत आहे. आरबीआयच्या या पदासाठी अर्ज करण्यास 24 फेब्रुवारीला सुरुवात झाली असून 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (RBI Recruitment for the post of Office Attendants 10th pass can apply 26 thousand salary)

10 वीच्या आधारावर निवड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च आहे. या पदासाठीची पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

अर्ज कसा करणार?

  1. सर्वप्रथम opportunities.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्या.
  2. होम पेज वरील ‘Recruitment for the post of Office Attendants – 2020’ या लिंक वर क्लिक करा\
  3. भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन वाचून Apply Online लिंक वर क्लिक करा
  4. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी चा वापर करा
  5. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीनं लॉगीन करा
  6. लॉगीन करुन अ‌ॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा
  7. डाऊनलोड केलेला अ‌ॅप्लिकेशन फॉर्म भरुन कागदत्रासंह पोस्टाद्वारे पाठवून द्या
  8. उमेदवार ज्या विभागात वास्तव्यास असेल त्या विभागातील आरबीआयच्या कार्यालयात अर्ज पाटवा

अर्जाची फी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील, आर्थिक मागास प्रवर्ग, ओबीसी उमेदावारांसाठी 450 रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. नोटिफिकेशन नुसार परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची विविध विभागात पोस्टिंग केली जाईल. अहमदाबाद मध्ये 50, बंगळुरूमध्ये 28, भोपाळमध्ये 25, चंडीगढ़मध्ये 31, चेन्नईमध्ये 71, हैदराबादमध्ये 57, जयपूर 43, कानपूरमध्ये 69, मुंबईत 202, नागपूरमध्ये 55 आणि नवी दिल्ली मध्ये 50 पदे निर्धारित करण्यात आली आहेत.इतर माहितीसाठी उमेदवारांनी आरबीआयच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

रविवार विशेष : नव्या वर्षात 32 हजार नव्या नोकऱ्यांची नांदी; 10 वी पासपासून PG पर्यंत शिकलेल्यांना सुवर्णसंधी

Job Alert: दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; अनेक पदांवर भरती

(RBI Recruitment for the post of Office Attendants 10th pass can apply 26 thousand salary)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.