AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC क्रॅक केल्यानंतर शिकावी लागते नवी भाषा, कशी असते LBSNAA मध्ये IAS Training? वाचा सविस्तर

मसूरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) इथे आयएएस प्रशिक्षण घेतले जाते. आता एवढा अभ्यास करून सिलेक्शन झाल्यावर देखील या अधिकाऱ्यांचं काय प्रकारचं प्रशिक्षण असतं? त्यात काय शिकवलं जातं? प्रशिक्षणात काय असतं? जाणून घेऊया..

UPSC क्रॅक केल्यानंतर शिकावी लागते नवी भाषा, कशी असते LBSNAA मध्ये IAS Training? वाचा सविस्तर
LBSNAA training IAS officerImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 27, 2023 | 12:52 PM
Share

नवी दिल्ली: UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा असल्याचे म्हटले जाते. त्यात यश मिळवण्यासाठी अनेक उमेदवारांना अनेक वर्षे लागतात. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सनदी अधिकाऱ्याच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. यामुळेच यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतरही उमेदवारांना काटेकोर प्रशिक्षण घ्यावे लागते. मसूरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) इथे आयएएस प्रशिक्षण घेतले जाते. आता एवढा अभ्यास करून सिलेक्शन झाल्यावर देखील या अधिकाऱ्यांचं काय प्रकारचं प्रशिक्षण असतं? त्यात काय शिकवलं जातं? प्रशिक्षणात काय असतं? जाणून घेऊया…

IAS अधिकाऱ्याचे प्रशिक्षण कसे असते?

LBSNAA मध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्तीपासून मानसिक आरोग्यापर्यंत मजबूत केले जाते. प्रशिक्षणादरम्यान इथे हिमालयन ट्रेकिंगही केले जाते. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला त्यात सामील व्हावे लागते. याशिवाय ग्रामविकास, कृषी व उद्योग विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. अधिकारी पद मिळण्यापूर्वी या प्रशिक्षणात सर्वांना सर्व क्षेत्रात सक्षम केले जाते.

IAS प्रशिक्षण कुठे असतं?

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत जावे लागते. उमेदवारांना मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकविली जातात. इथे येणारे सर्व उमेदवार आपल्या प्रोफाईलवर इथल्या आठवणी नक्कीच शेअर करतात. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला इथे सारखेच प्रशिक्षण मिळते.

नवीन भाषा शिकावी लागते

UPSC नागरी सेवा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत फेरीतून मिळालेल्या गुणांच्या आधारे रँक मिळतो. या पदांनुसार त्यांची आयएएस, आयपीएस किंवा आयएफएससाठी निवड केली जाते. रँकनुसार उमेदवारांना कॅडर अलॉट केले जाते.

मसूरी येथील LBSNAA येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅडरच्या राज्यात पाठवले जाते. अशा परिस्थितीत राज्यात योग्य प्रकारे काम करण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना स्थानिक भाषा शिकावी लागते. भाषा शिकल्यानंतर उमेदवारांना पुन्हा मसुरीला यावे लागते आणि मग भाषा शिकल्यानंतरच ते रुजू होतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.